शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

हिताच्या निर्णयांत बदल नाही; अधिकाधिक पुणेकरांना पीएमपीकडे आकर्षित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:35 IST

प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे : प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.नयना गुंडे यांनी सोमवारी ‘पीएमपी’ची सुत्र हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपली भुमिका स्पष्ट केली. तत्पुर्वी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन पीएमपीच्या कामकाजाची प्राथमिक माहिती घेतली. ‘पीएमपी’च्या रुपाने गुंडे यांच्याकडे पहिल्यांदाच परिवहन क्षेत्राशी संबंधित जबाबदारी आली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पीएमपीच्या कामकाजाची माहिती, सद्यस्थितीचा आढावा, यापुर्वीचे निर्णय समजून घेण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जाईल, असे गुंडे यांनी सांगितले.सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगून गुंडे म्हणाल्या, सुमारे १५ लाख प्रवासी मिळविण्याचे पीएमपीचे ध्येय आहे. त्यामुळे हे काम आव्हानात्मक असून थेट लोकांशी संबंध येत असल्याने काम करण्यास खुप वाव आहे.अनेक देशांमध्ये तेथील मोठे अधिकारी, पदाधिकारीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करतात. पुण्यातही बसचा वापर वाढायला हवा. रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला हवी. त्यासाठी प्रवासी संघटनाकिंवा संबंधितांकडून चांगल्यासुचना आल्या तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे गुंडे यांनी नमुद केले.महिला प्रवाशांना प्राधान्य1 पुण्यामध्ये नोकरी करणाºया महिलांची संख्या खुप मोठी आहे.या महिलांना खुप तारेवरची कसरत करावी लागते. अनेक महिलांना घरापासून खुप लांबच्या ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांसाठी विशेष बस आणि इतर सुविधा पुरविणे आवश्यक आहे.2खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसेस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे नयना गुंडे यांनी सांगितले.तुकाराम मुंढे यांच्या काही निर्णयांवर कर्मचारी तसेच प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर बोलताना गुंढे म्हणाल्या, तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. प्रशासनामध्ये खुप काम केले आहे.त्यावरच ते आणखी सक्षम होत जाईल. जे निर्णय प्रवासी आणि कंपनीच्या हिताचे असतील ते तसेच राहतील. कर्मचाºयांची बदली किंवा कारवाईबाबत आक्षेपांवर प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल.सरसकट निर्णय घेतले जाणार नाहीत. कर्मचाºयांच्या सोयीचाही विचार करणे आवश्यक आहे. ते मानसिकदृष्ट्या शांत असतील तर कामाच्यादृष्टीने फायदेशीर होते. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.वाहतूक हवी स्मार्टतंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी वाढत आहे. प्रवाशांना डोळ््यासमोर ठेवून बससेवा अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी वेळेत सेवा पुरविणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असेही गुंडे यांनी नमुद केले.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल