शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिताच्या निर्णयांत बदल नाही; अधिकाधिक पुणेकरांना पीएमपीकडे आकर्षित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:35 IST

प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे : प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.नयना गुंडे यांनी सोमवारी ‘पीएमपी’ची सुत्र हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपली भुमिका स्पष्ट केली. तत्पुर्वी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन पीएमपीच्या कामकाजाची प्राथमिक माहिती घेतली. ‘पीएमपी’च्या रुपाने गुंडे यांच्याकडे पहिल्यांदाच परिवहन क्षेत्राशी संबंधित जबाबदारी आली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पीएमपीच्या कामकाजाची माहिती, सद्यस्थितीचा आढावा, यापुर्वीचे निर्णय समजून घेण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जाईल, असे गुंडे यांनी सांगितले.सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगून गुंडे म्हणाल्या, सुमारे १५ लाख प्रवासी मिळविण्याचे पीएमपीचे ध्येय आहे. त्यामुळे हे काम आव्हानात्मक असून थेट लोकांशी संबंध येत असल्याने काम करण्यास खुप वाव आहे.अनेक देशांमध्ये तेथील मोठे अधिकारी, पदाधिकारीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करतात. पुण्यातही बसचा वापर वाढायला हवा. रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला हवी. त्यासाठी प्रवासी संघटनाकिंवा संबंधितांकडून चांगल्यासुचना आल्या तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे गुंडे यांनी नमुद केले.महिला प्रवाशांना प्राधान्य1 पुण्यामध्ये नोकरी करणाºया महिलांची संख्या खुप मोठी आहे.या महिलांना खुप तारेवरची कसरत करावी लागते. अनेक महिलांना घरापासून खुप लांबच्या ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांसाठी विशेष बस आणि इतर सुविधा पुरविणे आवश्यक आहे.2खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसेस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे नयना गुंडे यांनी सांगितले.तुकाराम मुंढे यांच्या काही निर्णयांवर कर्मचारी तसेच प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर बोलताना गुंढे म्हणाल्या, तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. प्रशासनामध्ये खुप काम केले आहे.त्यावरच ते आणखी सक्षम होत जाईल. जे निर्णय प्रवासी आणि कंपनीच्या हिताचे असतील ते तसेच राहतील. कर्मचाºयांची बदली किंवा कारवाईबाबत आक्षेपांवर प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल.सरसकट निर्णय घेतले जाणार नाहीत. कर्मचाºयांच्या सोयीचाही विचार करणे आवश्यक आहे. ते मानसिकदृष्ट्या शांत असतील तर कामाच्यादृष्टीने फायदेशीर होते. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.वाहतूक हवी स्मार्टतंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी वाढत आहे. प्रवाशांना डोळ््यासमोर ठेवून बससेवा अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी वेळेत सेवा पुरविणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असेही गुंडे यांनी नमुद केले.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल