शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

निरूप्रदवी, पण प्रभावशाली पुष्पाैषधी- निरामय लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

------------------- डॉ. बाख यांची पुष्पौषधी उपचार पद्धती ही सूक्ष्मपातळीवर काम करणारी आहे. शरीरास किंवा मानसिक विकार झाल्यास औषध घ्यावेच, ...

-------------------

डॉ. बाख यांची पुष्पौषधी उपचार पद्धती ही सूक्ष्मपातळीवर काम करणारी आहे. शरीरास किंवा मानसिक विकार झाल्यास औषध घ्यावेच, पण या पद्धतीत त्याहून सूक्ष्म अशा मानसिक पातळीवर उपचार होतो. रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करणे शक्य होते.

आपणा सर्वांमध्ये रोग पूर्ण बरा करण्याची ताकद आहे. पण काही मानिसक विकार झाले, विचारधारा, दृष्टिकोन चुकला की शरीरातील ऊर्जा-प्रणाली बिघडते. ऊर्जा अवरोध एनर्जी ब्लॉक तयार होतो व पुढे जाऊन हाच ऊर्जा अवरोध रोगाच्या लक्षणांच्या स्वरूपात दिसून येतो किंवा प्रत्यक्ष रोगाच्या रूपात अनुभवास येतो.

जोपर्यंत हा एनर्जी ब्लॉक पूर्णपणे विरघळून जात नाही, नष्ट होत नाही तोपर्यंत रोगाचे अस्तितत्व राहते. पुष्पौषधींमधील ऊर्जेच्या प्रवाहात हा ऊर्जा अवरोध पूर्णपणे विरघळून जातो. फुलांतील ऊर्जा वाहून नेण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे ही उपचारप्रणाली अत्यंत नैसर्गिक आहे.

काही गोष्टी प्रामुख्याने आपल्यासमोर येतात.

१) आरोग्य व आजार यांचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण, नुसत्या शरीर लक्षणांवरून नव्हे तर मन व आत्मा यांतील विसंवाद, नकारात्मक भावना, विचार व दृष्टिकोन यांच्या परिणामांचा विचार केला आहे. डॉ. बाख यांच्या मते रोग नसतोच, फक्त आजारी माणसं असतात. शिवाय या पद्धतीत विश्वबंधुत्व, सर्वसमावेशक प्रेम, विश्वप्रेम, आपल्याबरोबर इतरांचीही उन्नती यासारख्या आध्यात्मिक प्रेरणाही दिसून येतात. अर्थात, आम्हा भारतीयांना हे नवे नाही.

२) एक अगदी नवीन, आजच्या युगातील वेगळी अत्यंत शुद्ध, बिनविषारी, रसायनरहित, अत्यंत सोपी अशी ही उपचार पद्धती आहे. पुष्पौषधी या सरळ मनातील नकारात्मकतेवर परिणाम करीत असल्याने औषधाचा नको इतका मोठा जास्त डोस-ओव्हरडोस होत नाही. आपात्कालीन परिस्थितीत अगदी १० मिनिटांच्या अंतरानेही औषध घेता येते. पूर्णपणे दुष्परिणामरहित असल्याने एखादे वेगळेच औषध (पुष्पौषधी) घेतले गेले तर फक्त अपेक्षित परिणाम दिसणार नाही इतकेच काही वेगळे दुष्परिणाम निश्चितच संभवत नाहीत.

३) इतर उपचारपद्धतींची औषध योजना सुरू असतानाही पुष्पौषधी घेता येतात. त्याने रोग पूर्णपणे व लवकर बरा होण्यास मदतच होईल. कारण पुष्पौषधींनी मन स्वच्छ झाल्यानंतर शरीरही औषधास योग्य साध देईलच.

४) पुष्पौषधी उपचार पध्दती अतिशय निरूपद्रवी, सुरक्षित पण तितकीच परिणामकारक असल्याने त्यांचा वापर कोणीही करू शकतो. जसा सूर्यप्रकाशात बर्फ पूर्णपणे वितळतो, त्याचप्रमाणे पुष्पौषधीमधील ऊर्जेच्या प्रवाहात मनातील ऊर्जा-अवरोध विरघळून जाते.

५) या पद्धतीच्या वापरासाठी वैद्यकशास्त्राचे तसेच मानसशास्त्राचे फारसे ज्ञान असण्याची गरज नाही. रोग्याची सध्याची स्थिती कोणत्या विकारामुळे, नकारात्मक भावनेमुळे झाली आहे, हे ओळखता यायला हवे. त्याप्रमाणे औषध योजना करता येऊ शकते. त्यासाठी आकलनशक्ती, योग्य विचारशक्ती, परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करता येणे इत्यादी गोष्टींची गरज आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजारी व्यक्तीबद्दल दया, करूणा इत्यादी भावना मनापासून असणे फार जरूरीचे आहे. नैसर्गिक संवेदनशीलता व दुसऱ्याच्या भावनांचा आदर याची नितांत आवश्यकता आहे. समोरच्या व्यक्तीस तुम्ही नीट समजून घेतले नाहीत तर औषध काय देणार ? स्वत:साठी औषध घेतानासुध्दा याच गोष्टी लक्षात ठेवाव्यात. स्वत:स दोष न देता मैत्रीपूर्वक वातावरणात समस्या सोडवावी. हल्ली याच भावना तशा दुर्मीळ झाल्या आहेत म्हणा.

(वैज्ञानिक इशारा - सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे’)