शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

पुरंदर तालुक्यातील ६८ गावे निर्मल

By admin | Updated: January 23, 2017 02:30 IST

पुरंदर तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के निर्मलग्राम करण्यात यावीत, हगणदरीमुक्त व्हावीत, यासाठी पंचायत समिती

सासवड : पुरंदर तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के निर्मलग्राम करण्यात यावीत, हगणदरीमुक्त व्हावीत, यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कंबर कसण्यात आल्यानंतर या मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. गुडमॉर्निंग पथकाने केलेल्या कामगिरीमुळे आतापर्यंत तालुक्यातील ९० गावांपैकी ६८ गावे १०० टक्के निर्मलग्राम झाली आहेत. तसेच उर्वरित गावे येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन संपूर्ण तालुका १०० टक्के निर्मलग्राम होईल, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली. सासवड येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनमध्ये स्वच्छ भारत मिशन - निश्चय २ आॅक्टोबर २०१६ - हगणदरीमुक्त पुरंदर तालुका या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी तालुका हगणदरीमुक्त करण्याची शपथ दिली. पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, उपसभापती अनिता कुदळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. काळे, बालविकास प्रकल्पाधिकारी उषा जाधव, त्याचप्रमाणे पंचायत, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन व इतर विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मच७ारी, तसेच तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, मदतनीस, प्राथमिक शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते. तालुक्यातील गावांमध्ये १५ आॅगस्ट २०१६ पूर्वी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले होते. स्वच्छतागृहे ठरलेल्या काळात पूर्ण न झाल्यास संबंधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान देण्यात येणार नाही, कोणतेही दाखले देण्यात येणार नाहीत, अशा व्यक्तींना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळू नये, यासाठी बँकांना पत्रव्यवहार करण्यात येईल, यांसारख्या अनेक कारवाया प्रशासनातर्फे करण्यात येणार होत्या.याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक किंवा संपर्क अधिकारी यांच्याबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल, तलाठी, पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावर होती. त्यानंतर १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये त्याप्रमाणे सर्व ठराव मंजूर करण्यात आले. मात्र ठराव मंजूर होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच स्थानिक पातळीवर अनेक ग्रामपंचायतींकडून फारसा पाठपुरावा करण्यात आला नाही, तर काही गावांमधून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही अनेक नागरिकांनी केवळ विरोध किंवा त्रास देण्याच्या हेतूने शौचालयाचे बांधकामच केले नाही. त्यामुळे अनेक गावे आजही निर्मलग्राम होण्यापासून वंचित आहेत. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. नवरात्रोत्सवादरम्यान तसेच दिवाळीदरम्यान गॅस अथवा वीज कनेक्शन बंद केल्यास संबंधित कुटुंबांची अडचण होईल, तसेच किराणा अथवा रॉकेल न दिल्यास त्यांची अडचण वाढेल. ही समस्या लक्षात घेऊन पंचायत समितीने दिवाळी होईपर्यंत कारवाई पुढे ढकलली होती. मात्र यादरम्यानच्या काळात नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तहसीलदार सचिन गिरी, पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे व इतर विस्तार अधिकारी यांची एक मीटिंग होऊन यामध्ये ‘गुडमॉर्निंग’ पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे पथक स्थापन करण्यात येऊन बुधवारपासून दि. ९ नोव्हेंबर २०१६ पासून ते संपूर्ण तालुक्यात कार्यरत झाले. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी असे पथक नेमून रस्त्यावर अशी व्यक्ती शौचास बसलेली आढळून आल्यास थेट पोलीस कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले. (वार्ताहर)