शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:12 IST

राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे : राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक ब्लॉकचा अंदाज वर्तविला जाईल. त्यानुसार तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय भू विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन, सह सचिव डॉ. विपिन चंद्र, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नंजुनदिहा, हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंग (एचपीसी)चे प्रकल्प संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्युषचे लोकार्पण ही संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. एचपीसी प्रणालीअंतर्गत आतापर्यंत भारतात सुपर कॉम्प्युटरची क्षमता १ पेटाफ्लॉपपर्यंत होती. आयआयटीएममधील कॉम्प्युटरची क्षमता ४ पेटाफ्लॉप असून, नोएडा येथील संस्थेत पुढील आठवड्यात २.८ पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या क्षेत्रात होत असलेल्या विविध संशोधनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. त्यामुळे हवामान, त्सुनामी, वादळ, भूकंप यांसह विविध नैसर्गिक आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.या संगणकासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत सध्या विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक अचूकता येणार आहे. विभागामार्फत सध्या देशभरातील २ कोटी ४० लाख शेतक-यांपर्यंत हवामानविषयक माहिती थेट मोबाईलवर दिली जात आहे. २०१९ पर्यंत ४ कोटी ५० लाख शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. तर भविष्यात ९ कोटी ३० लाख मिलियन शेतक-यांचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.दरम्यान, प्रत्युषमुळे अधिक खोलवर आणि वेगाने संशोधन करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. तसेच हवामान आणि जलवायू क्षेत्रामध्ये काम करणा-या अन्य संशोधन संस्थांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.------------------------निधीची कमतरता नाहीविज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच संशोधनाला कमी निधी मिळत असल्याची ओरड चुकीची असून केंद्र सरकार सुरूवातीपासून याबाबतीत सकारात्मक असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. देशातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत. तसेच सर्व संशोधन संस्थामध्येही आता चांगला समन्वय होत असल्याचे त्यांनी सांगितले.