शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:12 IST

राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे : राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक ब्लॉकचा अंदाज वर्तविला जाईल. त्यानुसार तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय भू विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन, सह सचिव डॉ. विपिन चंद्र, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नंजुनदिहा, हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंग (एचपीसी)चे प्रकल्प संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्युषचे लोकार्पण ही संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. एचपीसी प्रणालीअंतर्गत आतापर्यंत भारतात सुपर कॉम्प्युटरची क्षमता १ पेटाफ्लॉपपर्यंत होती. आयआयटीएममधील कॉम्प्युटरची क्षमता ४ पेटाफ्लॉप असून, नोएडा येथील संस्थेत पुढील आठवड्यात २.८ पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या क्षेत्रात होत असलेल्या विविध संशोधनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. त्यामुळे हवामान, त्सुनामी, वादळ, भूकंप यांसह विविध नैसर्गिक आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.या संगणकासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत सध्या विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक अचूकता येणार आहे. विभागामार्फत सध्या देशभरातील २ कोटी ४० लाख शेतक-यांपर्यंत हवामानविषयक माहिती थेट मोबाईलवर दिली जात आहे. २०१९ पर्यंत ४ कोटी ५० लाख शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. तर भविष्यात ९ कोटी ३० लाख मिलियन शेतक-यांचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.दरम्यान, प्रत्युषमुळे अधिक खोलवर आणि वेगाने संशोधन करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. तसेच हवामान आणि जलवायू क्षेत्रामध्ये काम करणा-या अन्य संशोधन संस्थांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.------------------------निधीची कमतरता नाहीविज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच संशोधनाला कमी निधी मिळत असल्याची ओरड चुकीची असून केंद्र सरकार सुरूवातीपासून याबाबतीत सकारात्मक असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. देशातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत. तसेच सर्व संशोधन संस्थामध्येही आता चांगला समन्वय होत असल्याचे त्यांनी सांगितले.