शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

...रोज नवा जावई इथे, रोज नवा सासरा! रामदास फुटाणे यांचे फटकारे : संवाद, पुणेतर्फे अक्षरसेवा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार सोहळा पार पडला. त्या वेळी फुटाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यावेळी उपस्थित होते.

विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिरसाट यांच्या वतीने गोपाळ नेवे, टिळक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे तर जोगळेकर यांच्या वतीने ज्योती जोशी व स्नेहल मसालिया यांनी पुरकार स्वीकारला. पुण्यातील बालवाचनालय चालवणा-या संस्थांना या निमित्ताने पुस्तके (अक्षरभेट) भेट देण्यात आली. यात प्रसाद भडसावळे, निरजा जोशी, नरहरी पाटील यांचा समावेश होता.

प्रशांत जगताप म्हणाले, ‘बालसाहित्याने मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले. मात्र गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने सगळे चित्र बदलले आहे. मुले मुले मैदानात दिसणे आवश्यक असताना मोबाईलच्या आहारी गेली आहेत, पुस्तकांपासून दुरावली आहेत. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी पालकांनी मोबाईल हातात दिला. आता मुलांच्या चुकीच्या छंदाची किंमत मोजावी लागत आहे. अशा काळात बालसाहित्य चळवळ भक्कम रीतीने रुजण्याची गरज आहे. वाचनसंस्कृती टिकवणारी माणसे समाजात आहेत. पुस्तके माणसाचे आयुष्य बदलतात. डिजिटल युगात लोक अडकून पडले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम पुस्तकेच करू शकतात.' प्रसाद भडसावळे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रुती पानसे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद बालवडकर यांनी आभार मानले.

----------------

‘समाजात जातिद्वेष, धर्मांधता वाढली आहे. समाजाला विकृत वळण लागत आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. साहित्यिकांनी दुर्लक्ष केले तर भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच बालसाहित्य समृध्द होण्याची गरज आहे. मुलांना काय स्वीकारावे आणि नाकारावे याचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य पुस्तक देते. वाचनातून मुलांची कार्यक्षमता वाढते.

- रामदास फुटाणे

------------------------

मुले आणि बालसाहित्य सर्वात दुर्लक्षित घटक आहेत. त्यांनी वाचले नाही तर भविष्यातले वाचक तयार होणार नाहीत. लहानपणापासून वाचनाची पेरणी महत्वाची असते. पुस्तकांअभावी भरलेल्या घरात मुले अनाथ असतात. हे चित्र बदलण्यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे. प्रयत्न कायम राहिले तर बालसाहित्य समृद्ध होईल. कोरोनाने मुलांच्या भावविश्वात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी पुस्तकेच मदत करतील.

- किरण केंद्रे, संपादक, किशोर मासिक

------------------------------