शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

...रोज नवा जावई इथे, रोज नवा सासरा! रामदास फुटाणे यांचे फटकारे : संवाद, पुणेतर्फे अक्षरसेवा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार सोहळा पार पडला. त्या वेळी फुटाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यावेळी उपस्थित होते.

विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिरसाट यांच्या वतीने गोपाळ नेवे, टिळक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे तर जोगळेकर यांच्या वतीने ज्योती जोशी व स्नेहल मसालिया यांनी पुरकार स्वीकारला. पुण्यातील बालवाचनालय चालवणा-या संस्थांना या निमित्ताने पुस्तके (अक्षरभेट) भेट देण्यात आली. यात प्रसाद भडसावळे, निरजा जोशी, नरहरी पाटील यांचा समावेश होता.

प्रशांत जगताप म्हणाले, ‘बालसाहित्याने मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले. मात्र गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने सगळे चित्र बदलले आहे. मुले मुले मैदानात दिसणे आवश्यक असताना मोबाईलच्या आहारी गेली आहेत, पुस्तकांपासून दुरावली आहेत. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी पालकांनी मोबाईल हातात दिला. आता मुलांच्या चुकीच्या छंदाची किंमत मोजावी लागत आहे. अशा काळात बालसाहित्य चळवळ भक्कम रीतीने रुजण्याची गरज आहे. वाचनसंस्कृती टिकवणारी माणसे समाजात आहेत. पुस्तके माणसाचे आयुष्य बदलतात. डिजिटल युगात लोक अडकून पडले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम पुस्तकेच करू शकतात.' प्रसाद भडसावळे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रुती पानसे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद बालवडकर यांनी आभार मानले.

----------------

‘समाजात जातिद्वेष, धर्मांधता वाढली आहे. समाजाला विकृत वळण लागत आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. साहित्यिकांनी दुर्लक्ष केले तर भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच बालसाहित्य समृध्द होण्याची गरज आहे. मुलांना काय स्वीकारावे आणि नाकारावे याचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य पुस्तक देते. वाचनातून मुलांची कार्यक्षमता वाढते.

- रामदास फुटाणे

------------------------

मुले आणि बालसाहित्य सर्वात दुर्लक्षित घटक आहेत. त्यांनी वाचले नाही तर भविष्यातले वाचक तयार होणार नाहीत. लहानपणापासून वाचनाची पेरणी महत्वाची असते. पुस्तकांअभावी भरलेल्या घरात मुले अनाथ असतात. हे चित्र बदलण्यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे. प्रयत्न कायम राहिले तर बालसाहित्य समृद्ध होईल. कोरोनाने मुलांच्या भावविश्वात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी पुस्तकेच मदत करतील.

- किरण केंद्रे, संपादक, किशोर मासिक

------------------------------