शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

​​मनुष्यबळाच्या दृष्टीने महासत्ता बनणे हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे नवे ध्येय : राजेंद्र अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यामध्ये मनुष्यबळाच्या दृष्टीने महासत्ता बनणे हे आज देशाच्या परराष्ट्र धोरणाचे नवे ध्येय असल्याचे मत माजी भारतीय राजदूत व डिप्लोमसी आणि पब्लिक अफेअर्स या विषयातील तज्ज्ञ राजेंद्र अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यामध्ये मनुष्यबळाच्या दृष्टीने महासत्ता बनणे हे आज देशाच्या परराष्ट्र धोरणाचे नवे ध्येय असल्याचे मत माजी भारतीय राजदूत व डिप्लोमसी आणि पब्लिक अफेअर्स या विषयातील तज्ज्ञ राजेंद्र अभ्यंकर यांनी व्यक्त केले. मात्र असे असले तरी या ध्येयाची पुढील दिशा काय याबाबत स्पष्टता नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.  

पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अभ्यंकर लिखित ‘इंडियन डिप्लोमसी – बियॉण्ड स्ट्रॅटेजिक अॅटोनॉमी’ या पुस्तकाचे प्रकाशन यशदा येथे पार पडले. भारताचे माजी राजदूत एम. के. मंगलमूर्ती यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पीआयसीच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. अमिताव मलिक, पीआयसीचेउपाध्यक्ष डॉ. विजय केळकर​हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभ्यंकर म्हणाले की आज भारत संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण परिषदेतील (सिक्युरिटी कौन्सिलमधील) राष्ट्रांशी सातत्याने संवाद ठेवत आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय देशसमूहांमध्ये भारत  सक्रीय रहात आहे. तसेच विशिष्ट देशांशी संबंध सुधारण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. जगात सध्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने बदलांचे वारे वाहत असून भारत देखील या खेळात सहभागी झाला आहे. सध्याच्या जगात अर्थशास्त्र व राजकारण यामध्ये पुसटशी रेषा असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी पहायला मिळत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण परिषदेचे सदस्यत्व मिळविण्याचा भारत अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याबद्दल बोलताना अभ्यंकर म्हणाले की २०१६ मध्ये संरक्षण परिषदेतील ‘ग्रूप ऑफ फोर’ सदस्यांनी या सदस्यत्त्वाबाबत टप्प्या टप्प्याने वाटाघाटी करण्याचे ठरविले. त्यावेळी इतर अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारत या स्पर्धेत पुढे होता. २०१६ बरोबरच २०१७ मध्येही भारताच्या सदस्यत्त्वाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. मात्र येत्या सप्टेंबर २०१८ मध्ये काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्या