शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

अरुण दातेंची शासनदरबारी उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:15 IST

पुरस्कार ही प्रत्येक कलाकारासाठी कामाची पोचपावती असते. अरुण दाते यांनी एकाहून एक सरस रचनांमधून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मात्र, शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने अरुण दाते यांच्यासारख्या सर्वोच्च कलाकाराची शासनदरबारी उपेक्षा झाली, अशी खंत कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

पुणे : पुरस्कार ही प्रत्येक कलाकारासाठी कामाची पोचपावती असते. अरुण दाते यांनी एकाहून एक सरस रचनांमधून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मात्र, शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने अरुण दाते यांच्यासारख्या सर्वोच्च कलाकाराची शासनदरबारी उपेक्षा झाली, अशी खंत कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अरुण दाते यांनी संगीत क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. एकीकडे नवोदित कलावंतांना पद्म पुरस्कार मिळत आहेत; अशा वेळी राष्ट्रीय पातळीवरील पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांसाठी दातेंच्या नावाचा विचार व्हायला हवा होता, अशा भावना व्यक्त झाल्या. कला, साहित्य आणि संगीताचा सन्मान करण्याची भूमिका जपण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. अशा वेळी अरुण दाते यांचा सन्मान करण्याचे शहाणपण शासनाला सुचले नाही, असेही कलाकारांनी सांगितले.अरुण दाते यांनी गायकीतून स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. मात्र, शासनाकडून राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही पुरस्कारासाठी त्यांची दखल घेतली गेली नाही. अरुभय्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला नाही, याची त्यांना कधीच खंत वाटली नाही. पुरस्कार मिळाला तरच आपण मोठे होतो असे नसते, अशी त्यांची भावना होती. रसिकांचे प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होते.- अजय धोंगडे, ज्येष्ठ तबलावादकआपल्या विलक्षण गायकीतून अरुण दाते यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. रसिकांवर त्यांनी कायम स्वर-सुरांची बरसात केली. मराठी भावगीतांचे विश्व त्यांनी समृद्ध केले. या मोलाच्या योगदानाबद्दल अरुण दाते यांना शासनाचा पुरस्कार निश्चितच मिळायला हवा होता.- श्रीधर फडके, ज्येष्ठ गायक

टॅग्स :arun datearun datePuneपुणे