शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

By सायली जोशी-पटवर्धन | Updated: February 9, 2023 11:00 IST

घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

सायली जोशी-पटवर्धन / भानुदास पराड -

पुणे : लग्न लावून देणाऱ्या एजंटला ५ ते १० हजार रुपये द्यायचे, तासाभराचा विधी करायचा आणि ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने राहायचा निश्चय करायचा, इतकी सोपी ही प्रक्रिया. म्हणूनच देवाची आळंदी अशी जगभरात ओळख असलेल्या या शहराची आता ‘लग्नाचे हब’ अशी नवी ओळख बनली आहे. यात लग्न इंटरकास्ट असो की दुसरे-तिसरे, कमीत कमी खर्चात झटपट लग्न लावून देण्यासाठीची यंत्रणा आळंदीत कार्यरत आहे.

एकीकडे ज्ञानेश्वर माउलींचा गजर, तर दुसरीकडे पावलोपावली मंगल कार्यालये, धर्मशाळा आणि लग्न लावून देणाऱ्या एजंटची कार्यालये. येथे गुरुजी पाहावा लागत नाही ना फोटोग्राफर. लग्न करण्यासाठी अगदी अक्कलकोट, पालघर, मुंबई, औरंगाबाद असे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जोडपी येतात.

अनेक जाेडपी पळून आलेली घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे लग्नासाठी  मागतो. रीतसर लग्न झाल्यावर जोडप्याला प्रमाणपत्र देतो. परिस्थिती नसेल तर पैसे न घेताही लग्न लावून देतो.- युवराज ढाके, प्रमुख, मंगल संस्था

मी दोन वर्षांपूर्वी बीडहून आलो. आता अशी लग्न लावण्याबरोबरच वास्तुशांती, उदक शांत, पूजा-पाठ अशी कामे करतो. सुरुवातीला आम्ही एक साखरपुडा विधी करतो. पाहुणे, कपडे बदला-बदली, वाजंत्री असे काहीच नसल्याने हे सगळे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात होते. मुहूर्तही पाहिला जात नाही. दिवसाला साधारण ४ ते ५ लग्न लावतो.- एक गुरुजी (नाव न छापण्याच्या अटीवर)

आळंदीत लहान-मोठी मिळून एकूण १५० कार्यालये आहेत, तर ५०० धर्मशाळा आहेत. दिवसाला साधारण १०० ते १५० लग्न होतात. दिवसेंदिवस लग्नाचे प्रमाण वाढत आहे.- ज्ञानेश्वर वीर, प्रमुख व्यवस्थापक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी

टॅग्स :marriageलग्नAlandiआळंदी