शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नेत्यांची मांदियाळी, तरी प्रश्न अधांतरीच

By admin | Updated: March 16, 2015 04:28 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’

पुणे : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’, होर्डिंग धोरण असे काही प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणेकरांच्या पदरात त्यापैकी काय पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांत बारामती व इंदापूर तालुके वगळता शहराला एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे शतप्रतिशत भाजपाच्या घोषणेप्रमाणे पुणेकरांनी शहरातील आठही विधानसभेच्या जागांवर भाजपाचे आमदार निवडून दिले. शिवाय पिंपरी व जिल्ह्यात मिळून आणखी तीन जागा भाजपाला मिळाल्या. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट हेच पालकमंत्री आहेत. त्यांना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे अशी एकूण चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पुण्याची राजकीय ताकद केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर वाढली आहे. तरीही पुण्याच्या पाठीमागून नागपूरला मेट्रो व आयआयएमचा प्रकल्प मंजूर झाला, याची सल पुणेकरांना वाटत आहे. भाजपाकडून अमर साबळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडीची शिफारस आहे. त्यामुळे पुण्याला शरद पवार, प्रकाश जावडेकर, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, अनु आगा, संजय काकडे यांच्यानंतर दहावे खासदार म्हणून साबळे यांची निवड होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे मेट्रोसाठी १२५ कोटींची तरतूद झाली. मात्र, मेट्रो प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यासाठी पुण्याचे दहा खासदार काय प्रयत्न करणार, यावरच प्रकल्पांचे भवितव्य ठरणार आहे. विधानसभेचे २१ आणि विधान परिषदेचे ६ आमदार पुण्यात आहेत. त्यामुळे विधिमंडळात पुण्याची ताकद वाढली आहे. मात्र, या राजकीय ताकतीचे रूपांतर पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीमध्ये होणे गरजेचे आहे. तरच, गेल्या काही वर्षांतील पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आवश्यक रिंगरोड, शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेचे जाहिरात धोरण आदी प्रलंबित प्रश्न सोडविले जाऊ शकतात.