शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नेत्यांची मांदियाळी, तरी प्रश्न अधांतरीच

By admin | Updated: March 16, 2015 04:28 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’

पुणे : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’, होर्डिंग धोरण असे काही प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणेकरांच्या पदरात त्यापैकी काय पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांत बारामती व इंदापूर तालुके वगळता शहराला एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे शतप्रतिशत भाजपाच्या घोषणेप्रमाणे पुणेकरांनी शहरातील आठही विधानसभेच्या जागांवर भाजपाचे आमदार निवडून दिले. शिवाय पिंपरी व जिल्ह्यात मिळून आणखी तीन जागा भाजपाला मिळाल्या. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट हेच पालकमंत्री आहेत. त्यांना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे अशी एकूण चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पुण्याची राजकीय ताकद केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर वाढली आहे. तरीही पुण्याच्या पाठीमागून नागपूरला मेट्रो व आयआयएमचा प्रकल्प मंजूर झाला, याची सल पुणेकरांना वाटत आहे. भाजपाकडून अमर साबळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडीची शिफारस आहे. त्यामुळे पुण्याला शरद पवार, प्रकाश जावडेकर, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, अनु आगा, संजय काकडे यांच्यानंतर दहावे खासदार म्हणून साबळे यांची निवड होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे मेट्रोसाठी १२५ कोटींची तरतूद झाली. मात्र, मेट्रो प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यासाठी पुण्याचे दहा खासदार काय प्रयत्न करणार, यावरच प्रकल्पांचे भवितव्य ठरणार आहे. विधानसभेचे २१ आणि विधान परिषदेचे ६ आमदार पुण्यात आहेत. त्यामुळे विधिमंडळात पुण्याची ताकद वाढली आहे. मात्र, या राजकीय ताकतीचे रूपांतर पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीमध्ये होणे गरजेचे आहे. तरच, गेल्या काही वर्षांतील पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आवश्यक रिंगरोड, शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेचे जाहिरात धोरण आदी प्रलंबित प्रश्न सोडविले जाऊ शकतात.