शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

नीरा नदीतील बंधारे पाण्यावाचून कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:51 PM

दुष्काळाचा दाह वाढला : हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रातील निमसाखरपासून नीरा नरसिंहपूरपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्यावाचून कोरडे पडले आहे. इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात आली आहे. याच बरोबर नदीच्या पात्रालगत असलेल्या गावातील विहिरी व विंधनविहिरीचे पाणीही कमी होत आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा नदी ही वरदान आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साधारण जानेवारी महिन्यातच नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडत आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरनिमगाव, नीरानरसिंहपूर तर माळशिरस तालुक्यातील मोरेवस्ती, बागर्डे, पळसमंडळ, कदमवाडी, अकलूज अशी गावे आहेत. या गावांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी हे नीरा नदीच्या पात्रातील वापरतात. गेल्या काही वर्षांपासून नदीचे पात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच कोरडे पडत आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फटका बसत आहेत. निरवांगी, सराटी परिसरातील गावात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलने झाली; परंतु पाणी मात्र आलेच नाही. यामधील काही गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. यामुळे उन्हाळी पाणी आवर्तनापासून शेतकरी वंचित राहतात. डिसेंबर ते साधरण जुलैपर्यंत नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने नदी किनारी असलेल्या गावांतील विहिरी व बोअरवेल ही पाणी कमी पडत आहे. नीरा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या वर्षी निरवांगी या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता; परंतु पाणी सोडण्यात आलेच नाही.

टॅग्स :Puneपुणे