शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नीरा नदीतील बंधारे पाण्यावाचून कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:52 IST

दुष्काळाचा दाह वाढला : हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रातील निमसाखरपासून नीरा नरसिंहपूरपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्यावाचून कोरडे पडले आहे. इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात आली आहे. याच बरोबर नदीच्या पात्रालगत असलेल्या गावातील विहिरी व विंधनविहिरीचे पाणीही कमी होत आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा नदी ही वरदान आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साधारण जानेवारी महिन्यातच नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडत आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरनिमगाव, नीरानरसिंहपूर तर माळशिरस तालुक्यातील मोरेवस्ती, बागर्डे, पळसमंडळ, कदमवाडी, अकलूज अशी गावे आहेत. या गावांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी हे नीरा नदीच्या पात्रातील वापरतात. गेल्या काही वर्षांपासून नदीचे पात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच कोरडे पडत आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फटका बसत आहेत. निरवांगी, सराटी परिसरातील गावात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलने झाली; परंतु पाणी मात्र आलेच नाही. यामधील काही गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. यामुळे उन्हाळी पाणी आवर्तनापासून शेतकरी वंचित राहतात. डिसेंबर ते साधरण जुलैपर्यंत नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने नदी किनारी असलेल्या गावांतील विहिरी व बोअरवेल ही पाणी कमी पडत आहे. नीरा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या वर्षी निरवांगी या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता; परंतु पाणी सोडण्यात आलेच नाही.

टॅग्स :Puneपुणे