शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नीरा नदीतील बंधारे पाण्यावाचून कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:52 IST

दुष्काळाचा दाह वाढला : हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रातील निमसाखरपासून नीरा नरसिंहपूरपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्यावाचून कोरडे पडले आहे. इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात आली आहे. याच बरोबर नदीच्या पात्रालगत असलेल्या गावातील विहिरी व विंधनविहिरीचे पाणीही कमी होत आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा नदी ही वरदान आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साधारण जानेवारी महिन्यातच नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडत आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरनिमगाव, नीरानरसिंहपूर तर माळशिरस तालुक्यातील मोरेवस्ती, बागर्डे, पळसमंडळ, कदमवाडी, अकलूज अशी गावे आहेत. या गावांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी हे नीरा नदीच्या पात्रातील वापरतात. गेल्या काही वर्षांपासून नदीचे पात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच कोरडे पडत आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फटका बसत आहेत. निरवांगी, सराटी परिसरातील गावात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलने झाली; परंतु पाणी मात्र आलेच नाही. यामधील काही गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. यामुळे उन्हाळी पाणी आवर्तनापासून शेतकरी वंचित राहतात. डिसेंबर ते साधरण जुलैपर्यंत नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने नदी किनारी असलेल्या गावांतील विहिरी व बोअरवेल ही पाणी कमी पडत आहे. नीरा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या वर्षी निरवांगी या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता; परंतु पाणी सोडण्यात आलेच नाही.

टॅग्स :Puneपुणे