शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नीरा नदीतील बंधारे पाण्यावाचून कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:52 IST

दुष्काळाचा दाह वाढला : हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रातील निमसाखरपासून नीरा नरसिंहपूरपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्यावाचून कोरडे पडले आहे. इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात आली आहे. याच बरोबर नदीच्या पात्रालगत असलेल्या गावातील विहिरी व विंधनविहिरीचे पाणीही कमी होत आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा नदी ही वरदान आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साधारण जानेवारी महिन्यातच नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडत आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरनिमगाव, नीरानरसिंहपूर तर माळशिरस तालुक्यातील मोरेवस्ती, बागर्डे, पळसमंडळ, कदमवाडी, अकलूज अशी गावे आहेत. या गावांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी हे नीरा नदीच्या पात्रातील वापरतात. गेल्या काही वर्षांपासून नदीचे पात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच कोरडे पडत आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फटका बसत आहेत. निरवांगी, सराटी परिसरातील गावात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलने झाली; परंतु पाणी मात्र आलेच नाही. यामधील काही गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. यामुळे उन्हाळी पाणी आवर्तनापासून शेतकरी वंचित राहतात. डिसेंबर ते साधरण जुलैपर्यंत नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने नदी किनारी असलेल्या गावांतील विहिरी व बोअरवेल ही पाणी कमी पडत आहे. नीरा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या वर्षी निरवांगी या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता; परंतु पाणी सोडण्यात आलेच नाही.

टॅग्स :Puneपुणे