शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 02:07 IST

अपघाताला एक वर्ष पूर्ण : बोगद्यात उतरण्यासाठी लिफ्टची सोय; सुरक्षेची घेतली जातेय काळजी

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रकल्पाचे काम प्रगतिथावर आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कामाच्या व्यवस्थेत बदल करून बोगदा खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांना बोगद्यात उतरण्यासाठी लिप्टची सोय करण्यात आली आहे.

मागील वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी काम करून वर येत असताना क्रेनचा वायररोप तुटून दोनशे फूट खाली आदळून आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तीन महिने काम बंद ठेवून जीविताला धोका असणाºया यंत्रणेत बदल करून काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात दोनशे फूट खोल खाली उतरण्यासाठी कामगारांना लिप्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी असणारी जुनी यंत्रसामग्री बदलून नवीन यंत्ररचना करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना दिली. नीरा नदी ते उजनी धरण असा हा नदीजोड प्रकल्प असून तावशी, भवानीनगर, काझड, अकोले, भादलवाडी, डाळजमार्गे उजनी धरण असा बोगद्यामार्गे नदीजोड प्रकल्प असून, मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी कृष्णा मराठवाडा पाटबंधारे विभाग उस्मानाबाद यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकºयांचा विरोध असून, आता कृष्णा नदीचे पाणी अगोदर नीरा नदीत आणा. त्यानंतर नीरा नदीचे ८ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडा यासाठी आता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, काझड, अकोले, भादलवाडी या गावांच्या हद्दीमध्ये जमिनीपासून १५० फूट खोल खाली रात्रंदिवस युद्धपातळीवर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.२कुंभी-कासारी-कडवी-वारणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा हा सुमारे दोनशे किलोमीटरचा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे-उस्मानाबाद ते सोलापूर या जिल्ह्यांतून हा पाण्याचा प्रवास होऊन त्याचा साठा उजनी धरणात करण्याचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र ठराविक दिवसांनी यासाठी विरोध सुरू असून पूर्णत्वाला नेण्यासाठी अडचणींचा काळ ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater transportजलवाहतूक