शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दुर्घटनेमुळे बंद असलेला पुण्यातील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्प लवकरच होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:41 IST

नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम दुर्घटना घडल्यामुळे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. लवकरच पुन्हा या कामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे२० नोव्हेंबरला क्रेनचा वायरोप तुटून आठ कामगारांचा झाला होता दुर्दैवी मृत्यूसंबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने लोकांत तीव्र नाराजी

अकोले : नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम दुर्घटना घडल्यामुळे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. लवकरच पुन्हा या कामाला सुरुवात होणार आहे.अकोले येथील पाच नंबर शाप्टवर दि. २० नोव्हेंबरला क्रेनचा वायरोप तुटून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आजपर्यंत येथील काम बंद आहे. आता या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. मात्र, या आरोपींना या आठवड्यात जामीन मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ कामगारांपैकी एका स्थानिक कामगाराचा समावेश होता. मात्र, या घटनेला एक महिना होत आला असून, या कामाला कोणत्याही संघटना अथवा वैयक्तिक विरोध होत नसल्याने या बोगद्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाने काम सुरू करण्यासाठी पूजाअर्चा करण्यात आल्याचे बोगद्याच्या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.घटना झाल्यापासून या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांची जामिनावर मुक्ततादेखील केली आहे. त्यामुळे ही लोकांच्या समाधानासाठी दाखवायची प्रक्रिया असल्याचे लोक आपापसांत बोलत आहे. त्यामुळे जीव गेलेल्या लोकांच्या नशिबी खरा न्याय कधी मिळणार आणि या घटना घडण्याला कारणीभूत असणाऱ्या  गुन्हेगाराला शिक्षा कधी होणार का? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच राहणार, अशा प्रतिक्रिया स्थानिक व्यक्तकरत आहेत. मात्र, आठ कामगारांचा बळी जाऊनदेखील संबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

दुर्घटनेचा तपास अहवाल प्रलंबितचभिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सांगितले, की नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी भिगवण पोलिसांनी पुणे येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत पाहणी केली. या संदर्भातील अहवाल अजून पोलिसांना मिळाला नाही. 

टॅग्स :neera bhima projectनिरा भीमा नदीजोड प्रकल्पPuneपुणे