शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: May 13, 2017 04:18 IST

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे झपाट्याने वळत असलेले पाहायला मिळत आहे. यातून देशात सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. या युवाशक्तीला शाश्वत शेतीकडे वळविण्यात यश मिळाल्यास देशातील लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. यातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे सांगितले होते. याचा हेतूच हा होता, की शेतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती व्हावी. नेहरू युवा केंद्रातर्फे ग्रामीण भागातील युवकांना युवा मंडळांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवळपास ३०० ग्रामीण युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ आम्ही इंदापूर तालुक्यातून केला होता. पदवीधर युवकांना मोफत १०० तासांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.आम्ही मुळातच ग्रामीण भागातील युवकांच्या विकासासाठी काम करीत असतो. त्यामधून समाजात एकता टिकून राहावी, यासाठी विविध समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी सामूहिकरीत्या साजऱ्या करतो. आतापर्यंत या विभागाच्या वतीने मतदार जनजागृती, वसुंधरा दिन, लोकशाही दिन, पर्यावरण दिन, जागतिक एड्स दिन, संविधान दिन यासारखे उपक्रम युवा मंडळांना बरोबर घेऊन साजरे केले आहेत. यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती घडून येते. नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील तालुकानिहाय युवकांना निवडून त्याना ५,००० रुपये मानधन दिले जाते. या युवकांना समाजात सन्मानाने जगण्याची कला दोन वर्षांत शिकवली जाते. आज आमच्या विभागातून बाहेर पडलेले युवक मोठ्या पदांवर काम करतात. तर काहींनी राजकारणात चांगली प्रगती केली आहे. ‘स्वत:साठी नाही, तर समाजासाठी जागा’ अशी शिकवण आमच्याकडे या युवकांना दिली जाते. दोन वर्षे तयार करून या युवकांना समाजात काम करण्यासाठी सोडून दिले जाते. नेहरू युवा केंद्राकडून ८० टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. जेणेकरून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी विविध प्रशिक्षण, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजच्या युवकाने शेतीचे परिपूर्ण ज्ञान घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करून स्वत: यशस्वी व्हावे.नेहरू युवा केंद्राकडून युवकांना युवा समुदाय कार्यशाळा, कौशल्यविकास कार्यशाळा, क्रीडा प्रोत्साहन कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रम, राष्ट्रीय युवा धोरण यासारखे कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये संघटन निर्माण झाले, तर समाजाचा विकास होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, समाजात सर्वधर्मसमभाव निर्माण होणे गरजेचे आहे. नेहरू केंद्राकडून गावागावांतील प्रत्येक तरुण गावागावांत असणाऱ्या प्रत्येक समितीमध्ये तरुणांना स्थान मिळवून देण्याचे काम युवा केंद्रामार्फत केले जाते. आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने काहीसा समाजापासून दूर जाऊ लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने त्याचे समाजातील स्थान कमी होऊ लागले आहे. विकसित राष्ट्रांमध्ये चीन, अमेरिका, जपानसारख्या देशांमधील युवकांना विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे दिले जातात. त्यामुळे ते देश आज उच्च स्थानावर विराजमान आहेत. त्या ठिकाणी बेरोजगारी अस्तित्वात राहिलेली दिसत नाही. तसेच, आपल्या देशातील युवकांनाही विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे मिळाल्यास ते स्वत:चा उदरनिर्वाह स्वत: भागवू शकतात याची त्यांना जाणीव होईल. याचा फायदा होऊन आपल्या देशात अथवा राज्यात असणारी बेरोजगारी हटण्यास मोठी मदत होईल.