शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: May 13, 2017 04:18 IST

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे झपाट्याने वळत असलेले पाहायला मिळत आहे. यातून देशात सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. या युवाशक्तीला शाश्वत शेतीकडे वळविण्यात यश मिळाल्यास देशातील लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. यातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे सांगितले होते. याचा हेतूच हा होता, की शेतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती व्हावी. नेहरू युवा केंद्रातर्फे ग्रामीण भागातील युवकांना युवा मंडळांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवळपास ३०० ग्रामीण युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ आम्ही इंदापूर तालुक्यातून केला होता. पदवीधर युवकांना मोफत १०० तासांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.आम्ही मुळातच ग्रामीण भागातील युवकांच्या विकासासाठी काम करीत असतो. त्यामधून समाजात एकता टिकून राहावी, यासाठी विविध समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी सामूहिकरीत्या साजऱ्या करतो. आतापर्यंत या विभागाच्या वतीने मतदार जनजागृती, वसुंधरा दिन, लोकशाही दिन, पर्यावरण दिन, जागतिक एड्स दिन, संविधान दिन यासारखे उपक्रम युवा मंडळांना बरोबर घेऊन साजरे केले आहेत. यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती घडून येते. नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील तालुकानिहाय युवकांना निवडून त्याना ५,००० रुपये मानधन दिले जाते. या युवकांना समाजात सन्मानाने जगण्याची कला दोन वर्षांत शिकवली जाते. आज आमच्या विभागातून बाहेर पडलेले युवक मोठ्या पदांवर काम करतात. तर काहींनी राजकारणात चांगली प्रगती केली आहे. ‘स्वत:साठी नाही, तर समाजासाठी जागा’ अशी शिकवण आमच्याकडे या युवकांना दिली जाते. दोन वर्षे तयार करून या युवकांना समाजात काम करण्यासाठी सोडून दिले जाते. नेहरू युवा केंद्राकडून ८० टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. जेणेकरून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी विविध प्रशिक्षण, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजच्या युवकाने शेतीचे परिपूर्ण ज्ञान घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करून स्वत: यशस्वी व्हावे.नेहरू युवा केंद्राकडून युवकांना युवा समुदाय कार्यशाळा, कौशल्यविकास कार्यशाळा, क्रीडा प्रोत्साहन कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रम, राष्ट्रीय युवा धोरण यासारखे कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये संघटन निर्माण झाले, तर समाजाचा विकास होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, समाजात सर्वधर्मसमभाव निर्माण होणे गरजेचे आहे. नेहरू केंद्राकडून गावागावांतील प्रत्येक तरुण गावागावांत असणाऱ्या प्रत्येक समितीमध्ये तरुणांना स्थान मिळवून देण्याचे काम युवा केंद्रामार्फत केले जाते. आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने काहीसा समाजापासून दूर जाऊ लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने त्याचे समाजातील स्थान कमी होऊ लागले आहे. विकसित राष्ट्रांमध्ये चीन, अमेरिका, जपानसारख्या देशांमधील युवकांना विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे दिले जातात. त्यामुळे ते देश आज उच्च स्थानावर विराजमान आहेत. त्या ठिकाणी बेरोजगारी अस्तित्वात राहिलेली दिसत नाही. तसेच, आपल्या देशातील युवकांनाही विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे मिळाल्यास ते स्वत:चा उदरनिर्वाह स्वत: भागवू शकतात याची त्यांना जाणीव होईल. याचा फायदा होऊन आपल्या देशात अथवा राज्यात असणारी बेरोजगारी हटण्यास मोठी मदत होईल.