शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

युवाशक्तीने शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Updated: May 13, 2017 04:18 IST

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार

जगात ‘युवकांचा देश’ अशी ओळख असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये बेरोजगारी असलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे झपाट्याने वळत असलेले पाहायला मिळत आहे. यातून देशात सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. या युवाशक्तीला शाश्वत शेतीकडे वळविण्यात यश मिळाल्यास देशातील लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. यातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे सांगितले होते. याचा हेतूच हा होता, की शेतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती व्हावी. नेहरू युवा केंद्रातर्फे ग्रामीण भागातील युवकांना युवा मंडळांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवळपास ३०० ग्रामीण युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ आम्ही इंदापूर तालुक्यातून केला होता. पदवीधर युवकांना मोफत १०० तासांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.आम्ही मुळातच ग्रामीण भागातील युवकांच्या विकासासाठी काम करीत असतो. त्यामधून समाजात एकता टिकून राहावी, यासाठी विविध समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी सामूहिकरीत्या साजऱ्या करतो. आतापर्यंत या विभागाच्या वतीने मतदार जनजागृती, वसुंधरा दिन, लोकशाही दिन, पर्यावरण दिन, जागतिक एड्स दिन, संविधान दिन यासारखे उपक्रम युवा मंडळांना बरोबर घेऊन साजरे केले आहेत. यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती घडून येते. नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील तालुकानिहाय युवकांना निवडून त्याना ५,००० रुपये मानधन दिले जाते. या युवकांना समाजात सन्मानाने जगण्याची कला दोन वर्षांत शिकवली जाते. आज आमच्या विभागातून बाहेर पडलेले युवक मोठ्या पदांवर काम करतात. तर काहींनी राजकारणात चांगली प्रगती केली आहे. ‘स्वत:साठी नाही, तर समाजासाठी जागा’ अशी शिकवण आमच्याकडे या युवकांना दिली जाते. दोन वर्षे तयार करून या युवकांना समाजात काम करण्यासाठी सोडून दिले जाते. नेहरू युवा केंद्राकडून ८० टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. जेणेकरून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी विविध प्रशिक्षण, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजच्या युवकाने शेतीचे परिपूर्ण ज्ञान घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करून स्वत: यशस्वी व्हावे.नेहरू युवा केंद्राकडून युवकांना युवा समुदाय कार्यशाळा, कौशल्यविकास कार्यशाळा, क्रीडा प्रोत्साहन कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रम, राष्ट्रीय युवा धोरण यासारखे कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये संघटन निर्माण झाले, तर समाजाचा विकास होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, समाजात सर्वधर्मसमभाव निर्माण होणे गरजेचे आहे. नेहरू केंद्राकडून गावागावांतील प्रत्येक तरुण गावागावांत असणाऱ्या प्रत्येक समितीमध्ये तरुणांना स्थान मिळवून देण्याचे काम युवा केंद्रामार्फत केले जाते. आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने काहीसा समाजापासून दूर जाऊ लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक व्यसनाधीनतेच्या आरी जाऊ लागल्याने त्याचे समाजातील स्थान कमी होऊ लागले आहे. विकसित राष्ट्रांमध्ये चीन, अमेरिका, जपानसारख्या देशांमधील युवकांना विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे दिले जातात. त्यामुळे ते देश आज उच्च स्थानावर विराजमान आहेत. त्या ठिकाणी बेरोजगारी अस्तित्वात राहिलेली दिसत नाही. तसेच, आपल्या देशातील युवकांनाही विद्यार्थिदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे मिळाल्यास ते स्वत:चा उदरनिर्वाह स्वत: भागवू शकतात याची त्यांना जाणीव होईल. याचा फायदा होऊन आपल्या देशात अथवा राज्यात असणारी बेरोजगारी हटण्यास मोठी मदत होईल.