शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

ज्ञानक्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आज साहित्य किंवा तंत्रज्ञान कोणतेही क्षेत्र असो, भारतात प्रयोग किंवा संशोधन होताना दिसत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: आज साहित्य किंवा तंत्रज्ञान कोणतेही क्षेत्र असो, भारतात प्रयोग किंवा संशोधन होताना दिसत नाही. पाश्चात्य देशात अस्तित्ववाद किंवा वास्तववादाचे वारे आले की, तोच प्रवाह, प्रघात भारतीय साहित्यात दिसायला लागतो, यापेक्षा भारतात साहित्यिकांनी आणि तंत्रज्ञानांनी ज्ञान क्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

अथर्व पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे लिखित ‘चाैकट’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डाॅ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील हे होते. या वेळी व्यासपीठावर पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे-शिंदे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. पूर्वी समाजाचे नेतृत्व करणारे लोक हे साहित्यिक मनाचे होते. य़शवंतराव चव्हाण हे सर्वात मोठे उदाहरण आपल्याला माहिती आहे. परंतु कालांतराने झटपटच्या नादात साहित्य वाचन, विवेचन, मनन, चिंतन, चर्चा आदी गोष्टींना दुय्यम स्थान देऊन राजकीय नेतृत्व पुढे येऊ लागले. यामुळे साहित्य वाचनातून जी समज येते, विचारांना खोली प्राप्त होते त्याचा अभाव दिसू लागला. राजकारणाच्या धबडग्यात राहूनही जी राजकीय व्यक्ती त्याच्या साहित्यिक जाणिवा जागृत ठेवते, तिला सर्वच ठिकाणी मान-सन्मान मिळतो.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, लेखक, साहित्यिक हे समाजाचे दिशादर्शक असून, समाजाला शहाणे करुन सोडण्याचे काम ते करीत असतात. अशा समर्पित साहित्यिकांमुळेच समाज भरकटण्यापासून वाचतो.

लेखक वि.दा पिंगळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिीपाली धुमाळ आणि नगरसेविका सायली वांजळे-शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

.....