शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे : डॉ. महेश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची (रविकिरण सासवडे) बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच ...

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची

(रविकिरण सासवडे)

बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच भविष्यातील कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करू शकतो. स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे आहे. तरच यापुढे आपण स्थानिक अन्नसाखळी मजबूत ठेऊ शकतो, असे मत बारामती येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘कोरोना साथरोग जैवविविधता आणि मानवी जीवनशैली’ याबाबत ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, आपल्या अवतीभोवती असणारी वड, उंबर, पिंपळ, पळस, पांगारा, काटेसावर, जांभूळ, बाभूळसारखी बहुपयोगी वृक्षसंपदा वाढवणे गरजेचे आहे. कारण यात जीवनदायी व वटवृक्ष असे या वृक्षांना संबोधले जाते. कारण जैवविविधतेत हे वृक्ष लाखो जीवांना जीवदान, आहार, निवारा देत असतात. शिवाय दिवसभर मोठ्या प्रमाणात प्राणवायू देत असतात. निसर्गातील वनस्पती नियमानुसार प्राणवायू फक्त दिवसा देतात. मात्र, आपल्या संस्कृतीत तुळस २४ तास प्राणवायू देते असे सांगतात. समुद्रातील अनेक छोट्या पाणवनस्पती जास्त प्राणवायू देतात. यात जमिनीवरील झाडांचा खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. विशेषत: जमिनीवरील वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे, कारण जर झाडे नसतील तर पृथ्वीवर एकही जीव जगणार नाही, हे शास्त्र सांगते. ऑक्सिजननिर्मिती होताना समुद्रापासून सुरुवात झाली आणि आता यात मोठा वाटा जमिनीवरील हिरवाईचा आहे. याकडे माणसाचे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासारखी महामारी आपल्याला कधीही आवरता येणार नाही, हे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.

शहरात तर ८० टक्केपेक्षा जास्त परदेशी झाड लाऊन आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडे, गवत, झुडपे, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाड सर्वकाही नष्ट करून त्याजागी परदेशी झाड लावली. जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन वायू हा फक्त हिरव्या वनस्पती निर्माण करू शकतात, याची जाणीव करून देणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. ज्या भागातील स्थानिक जैवविविधता जास्त प्रमाणत बळकट असेल त्या भागातील सर्व जीवांच्या जगण्यातील आनंद व समाधान जास्त असते. किफायतशीर, सहजीवन, पर्यावरणपूरक, निसर्ग संतुलितपणा अशा अनेक पैलूंचा विचार करता, स्थानिक वृक्षसंपदा अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यातील आपली जीवनशैली आरोग्यदायक ठेवण्यासाठी डोळसपणे निसर्गाकडे पाहण्याची व त्याला वाचवण्याची.

ज्या देशाची जैवविविधता बळकट आहे, तिथे कोरोना हाहाकार कमी आहे. अगदी भूतानसारखा गरीब देश मात्र कोरोनावर जवळपास त्यांनी विजय मिळविला आहे. अर्थात भूतानचे जंगल हे जवळपास ७० टक्के एवढे आहे, देशाच्या भूभागांपैकी. अर्थात भूतान हा झीरो कार्बन असलेला एकमेव देश, जिथे एकही कारखाना नाही. मात्र, जगातील सर्वांत जास्त आनंदी व समाधानी देश अशी ओळख आहे.

---------------------