शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे : डॉ. महेश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची (रविकिरण सासवडे) बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच ...

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची

(रविकिरण सासवडे)

बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच भविष्यातील कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करू शकतो. स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे आहे. तरच यापुढे आपण स्थानिक अन्नसाखळी मजबूत ठेऊ शकतो, असे मत बारामती येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘कोरोना साथरोग जैवविविधता आणि मानवी जीवनशैली’ याबाबत ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, आपल्या अवतीभोवती असणारी वड, उंबर, पिंपळ, पळस, पांगारा, काटेसावर, जांभूळ, बाभूळसारखी बहुपयोगी वृक्षसंपदा वाढवणे गरजेचे आहे. कारण यात जीवनदायी व वटवृक्ष असे या वृक्षांना संबोधले जाते. कारण जैवविविधतेत हे वृक्ष लाखो जीवांना जीवदान, आहार, निवारा देत असतात. शिवाय दिवसभर मोठ्या प्रमाणात प्राणवायू देत असतात. निसर्गातील वनस्पती नियमानुसार प्राणवायू फक्त दिवसा देतात. मात्र, आपल्या संस्कृतीत तुळस २४ तास प्राणवायू देते असे सांगतात. समुद्रातील अनेक छोट्या पाणवनस्पती जास्त प्राणवायू देतात. यात जमिनीवरील झाडांचा खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. विशेषत: जमिनीवरील वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे, कारण जर झाडे नसतील तर पृथ्वीवर एकही जीव जगणार नाही, हे शास्त्र सांगते. ऑक्सिजननिर्मिती होताना समुद्रापासून सुरुवात झाली आणि आता यात मोठा वाटा जमिनीवरील हिरवाईचा आहे. याकडे माणसाचे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासारखी महामारी आपल्याला कधीही आवरता येणार नाही, हे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.

शहरात तर ८० टक्केपेक्षा जास्त परदेशी झाड लाऊन आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडे, गवत, झुडपे, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाड सर्वकाही नष्ट करून त्याजागी परदेशी झाड लावली. जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन वायू हा फक्त हिरव्या वनस्पती निर्माण करू शकतात, याची जाणीव करून देणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. ज्या भागातील स्थानिक जैवविविधता जास्त प्रमाणत बळकट असेल त्या भागातील सर्व जीवांच्या जगण्यातील आनंद व समाधान जास्त असते. किफायतशीर, सहजीवन, पर्यावरणपूरक, निसर्ग संतुलितपणा अशा अनेक पैलूंचा विचार करता, स्थानिक वृक्षसंपदा अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यातील आपली जीवनशैली आरोग्यदायक ठेवण्यासाठी डोळसपणे निसर्गाकडे पाहण्याची व त्याला वाचवण्याची.

ज्या देशाची जैवविविधता बळकट आहे, तिथे कोरोना हाहाकार कमी आहे. अगदी भूतानसारखा गरीब देश मात्र कोरोनावर जवळपास त्यांनी विजय मिळविला आहे. अर्थात भूतानचे जंगल हे जवळपास ७० टक्के एवढे आहे, देशाच्या भूभागांपैकी. अर्थात भूतान हा झीरो कार्बन असलेला एकमेव देश, जिथे एकही कारखाना नाही. मात्र, जगातील सर्वांत जास्त आनंदी व समाधानी देश अशी ओळख आहे.

---------------------