शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे : डॉ. महेश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची (रविकिरण सासवडे) बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच ...

पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची

(रविकिरण सासवडे)

बारामती : ऑक्सिजन ही निसर्गाची देणं आहे. यासाठी आपण स्थानिक प्रजातींची झाडे लावली तरच भविष्यातील कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करू शकतो. स्थानिक जैवविविधता बळकट करणे गरजेचे आहे. तरच यापुढे आपण स्थानिक अन्नसाखळी मजबूत ठेऊ शकतो, असे मत बारामती येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘कोरोना साथरोग जैवविविधता आणि मानवी जीवनशैली’ याबाबत ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, आपल्या अवतीभोवती असणारी वड, उंबर, पिंपळ, पळस, पांगारा, काटेसावर, जांभूळ, बाभूळसारखी बहुपयोगी वृक्षसंपदा वाढवणे गरजेचे आहे. कारण यात जीवनदायी व वटवृक्ष असे या वृक्षांना संबोधले जाते. कारण जैवविविधतेत हे वृक्ष लाखो जीवांना जीवदान, आहार, निवारा देत असतात. शिवाय दिवसभर मोठ्या प्रमाणात प्राणवायू देत असतात. निसर्गातील वनस्पती नियमानुसार प्राणवायू फक्त दिवसा देतात. मात्र, आपल्या संस्कृतीत तुळस २४ तास प्राणवायू देते असे सांगतात. समुद्रातील अनेक छोट्या पाणवनस्पती जास्त प्राणवायू देतात. यात जमिनीवरील झाडांचा खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. विशेषत: जमिनीवरील वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे, कारण जर झाडे नसतील तर पृथ्वीवर एकही जीव जगणार नाही, हे शास्त्र सांगते. ऑक्सिजननिर्मिती होताना समुद्रापासून सुरुवात झाली आणि आता यात मोठा वाटा जमिनीवरील हिरवाईचा आहे. याकडे माणसाचे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासारखी महामारी आपल्याला कधीही आवरता येणार नाही, हे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.

शहरात तर ८० टक्केपेक्षा जास्त परदेशी झाड लाऊन आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडे, गवत, झुडपे, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाड सर्वकाही नष्ट करून त्याजागी परदेशी झाड लावली. जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन वायू हा फक्त हिरव्या वनस्पती निर्माण करू शकतात, याची जाणीव करून देणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. ज्या भागातील स्थानिक जैवविविधता जास्त प्रमाणत बळकट असेल त्या भागातील सर्व जीवांच्या जगण्यातील आनंद व समाधान जास्त असते. किफायतशीर, सहजीवन, पर्यावरणपूरक, निसर्ग संतुलितपणा अशा अनेक पैलूंचा विचार करता, स्थानिक वृक्षसंपदा अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यातील आपली जीवनशैली आरोग्यदायक ठेवण्यासाठी डोळसपणे निसर्गाकडे पाहण्याची व त्याला वाचवण्याची.

ज्या देशाची जैवविविधता बळकट आहे, तिथे कोरोना हाहाकार कमी आहे. अगदी भूतानसारखा गरीब देश मात्र कोरोनावर जवळपास त्यांनी विजय मिळविला आहे. अर्थात भूतानचे जंगल हे जवळपास ७० टक्के एवढे आहे, देशाच्या भूभागांपैकी. अर्थात भूतान हा झीरो कार्बन असलेला एकमेव देश, जिथे एकही कारखाना नाही. मात्र, जगातील सर्वांत जास्त आनंदी व समाधानी देश अशी ओळख आहे.

---------------------