शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:20 PM

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देसिमला आॅफिस वेधशाळेत डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यानफेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या थेट वेगाने जमिनीवर कोसळून करतात मोठे नुकसान

पुणे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले़ राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीटीबाबत डॉ़ कुलकर्णी यांचे व्याख्यान सिमला आॅफिस वेधशाळेत आयोजित करण्यात आले होते़ डॉ़ कुलकर्णी म्हणाले, की २०१४ पासून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या भूभागावर गारपीट होत आहे़ ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ३ ते ४ हजार हेक्टर आणि २०० तालुक्यांमध्ये ही गारपीट झाली़ अजूनही गारपीट मोजण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही़ ही गारपीट सकाळच्या वेळी झाली़ वातावरण थंड असल्याने या गारा अनेक तास तशाच होत्या़ उन्हाळ्यातही आपल्याकडे वळवाच्या पावसाबरोबर गारांचा पाऊस होतो़ पण, तो सायंकाळच्या वेळी होऊन या गारा उष्म्यामुळे लगेच वितळतात़ उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्रावरून येणारे वारे एकमेकांशी भिडल्याने त्यातील बाष्प मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन त्यांचे हिमकणात रूपांतर होते़ खालून हवेचा दाब असल्याने त्यांचे एकमेकांवर थर तयार होतात़ त्या जड झाल्यावर एखादा भागातून त्या खाली कोसळतात़फेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या हवेत न वितळता थेट वेगाने जमिनीवर कोसळून मोठे नुकसान करतात़ गारा यांचे एकूण ११ प्रकार असतात़ पण, त्याबाबत अजूनही लोकांपर्यंत आवश्यक ती जनजागृती झालेली नाही़ या गारा कधी, कोठे, किती वेळ आणि त्यांची जाडी किती होती याची माहिती लोकांनी नोंदवून ठेवून हवामान विभागाला कळविली तर डाटा तयार होऊ शकतो़ त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटPuneपुणे