शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:23 IST

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देसिमला आॅफिस वेधशाळेत डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यानफेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या थेट वेगाने जमिनीवर कोसळून करतात मोठे नुकसान

पुणे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले़ राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीटीबाबत डॉ़ कुलकर्णी यांचे व्याख्यान सिमला आॅफिस वेधशाळेत आयोजित करण्यात आले होते़ डॉ़ कुलकर्णी म्हणाले, की २०१४ पासून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या भूभागावर गारपीट होत आहे़ ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ३ ते ४ हजार हेक्टर आणि २०० तालुक्यांमध्ये ही गारपीट झाली़ अजूनही गारपीट मोजण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही़ ही गारपीट सकाळच्या वेळी झाली़ वातावरण थंड असल्याने या गारा अनेक तास तशाच होत्या़ उन्हाळ्यातही आपल्याकडे वळवाच्या पावसाबरोबर गारांचा पाऊस होतो़ पण, तो सायंकाळच्या वेळी होऊन या गारा उष्म्यामुळे लगेच वितळतात़ उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्रावरून येणारे वारे एकमेकांशी भिडल्याने त्यातील बाष्प मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन त्यांचे हिमकणात रूपांतर होते़ खालून हवेचा दाब असल्याने त्यांचे एकमेकांवर थर तयार होतात़ त्या जड झाल्यावर एखादा भागातून त्या खाली कोसळतात़फेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या हवेत न वितळता थेट वेगाने जमिनीवर कोसळून मोठे नुकसान करतात़ गारा यांचे एकूण ११ प्रकार असतात़ पण, त्याबाबत अजूनही लोकांपर्यंत आवश्यक ती जनजागृती झालेली नाही़ या गारा कधी, कोठे, किती वेळ आणि त्यांची जाडी किती होती याची माहिती लोकांनी नोंदवून ठेवून हवामान विभागाला कळविली तर डाटा तयार होऊ शकतो़ त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटPuneपुणे