शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

दुर्लक्षित वारशांकडे लक्ष देण्याची गरज

By admin | Updated: April 18, 2017 02:30 IST

युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे.

युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. त्यामुळे जागतिक वारसा दिनाच्या पार्श्वभूमीवर देगलूरकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.देगलूरकर यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्राचीन वारशांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यातील अनेक ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला आली आहेत. पर्यटकांचा ओढा त्या ठिकाणी वाढला आहे. अजिंठा, वेरुळ, कार्ला लेणी ही ठिकाणे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे बनली आहे. अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या वारशाकडे पुरातत्त्व विभागाकडून चांगल्या प्रकारे लक्ष दिले जात आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे पर्यटकांचा ओढा कमी आहे. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या ती मंदिरे, मशिदी, लेणी, गडकिल्ले, स्तूप, मनोरे खूप महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षांचा इतिहास या ठिकाणांमध्ये सामावलेला आहे. अशा वारशाचे चांगल्या प्रकारे जतन व्हावे, यासाठी शासनाने व स्थानिक लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्राचीन वारशाचे जतन करण्याची जबाबदारी शासनाची तर आहेच; मात्र त्याचबरोबर तिथल्या स्थानिक नागरिकांनीही त्यांचे काळजीपूर्वक जतन होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. पुरातत्त्व विभागाबरोबरच महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या स्थानिक पातळीवरील शासन संस्थांनी या वास्तूंचे योग्य प्रकारे जतन होईल, यावर भर द्यावा. काही दिवसांपूर्वी मी बहारिनला गेलो होतो. तिथे एका उजाड अशा ठिकाणी एक प्राचीन विहीर होती. त्या विहिरीच्या आजूबाजूला फारसे काही नव्हते. मात्र ती विहीर प्राचीन ठेवा असल्याने शासनाकडून अत्यंत काळजीपूर्वक तिचे जतन करण्यात आले होते. त्या विहिरीची देखरेख करणाऱ्या रखवालदारांसाठी वातानुकूलित केबिन उभारण्यात आल्या होत्या. त्या विहिरीची पडझड होऊ नये, यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. यावरून फारसा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांचे जतन करण्यासाठी बहारिन शासन किती दक्ष होते, याची कल्पना येते. त्याचप्रमाणे आपल्याकडेही पर्यटनप्रिय नसलेल्या प्राचीन वारशांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवा ठेवला आहे, याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना होण्यासाठी या वारशांचे जतन झालेच पाहिजे. जुन्या वास्तू, वाडे या अनेक वर्षांपूर्वीचे वास्तूशास्त्र कसे होते, याचा इतिहास उलगडून दाखवितात. जुनी मंदिरे, तिथली शिल्प हादेखील महत्त्वपूर्ण ठेवा आहे. सातवाहन काळातील तेर गावामध्ये अनेक जुनी देवळे आहेत. त्यातून गावाची प्राचीन परंपरा समोर येते. प्राचीन किल्ले, वास्तू, लेण्यांवर खडूने अथवा कोळशाने लिहून त्या विद्रूप करण्याचा प्रकार टवाळखोर पर्यटकांकडून केला जातो. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यामुळे फारशा प्रसिद्धीस न आलेल्या वास्तू पर्यटकांच्या समोर आणायच्या की नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. शालेयस्तरावरच मुलांना जागतिक वारसा जतन करण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमामध्ये प्राचीन वारसा जतन का केला पाहिजे, याची सविस्तर महिती दिली पाहिजे. अनेक जुन्या वाड्यांमध्ये खूप वर्षे जुन्या वस्तू, शस्त्रे असतात. त्या वस्तूंचे चांगले संग्रहालय करून अधिक चांगल्या पद्धतीने त्या जतन करणे आवश्यक आहे.