शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

दुर्लक्षित वारशांकडे लक्ष देण्याची गरज

By admin | Updated: April 18, 2017 02:30 IST

युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे.

युनेस्कोच्या वतीने १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्राचीन वारशांचे जतन व्हावे, यासाठी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. त्यामुळे जागतिक वारसा दिनाच्या पार्श्वभूमीवर देगलूरकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.देगलूरकर यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्राचीन वारशांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यातील अनेक ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला आली आहेत. पर्यटकांचा ओढा त्या ठिकाणी वाढला आहे. अजिंठा, वेरुळ, कार्ला लेणी ही ठिकाणे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे बनली आहे. अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या वारशाकडे पुरातत्त्व विभागाकडून चांगल्या प्रकारे लक्ष दिले जात आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे पर्यटकांचा ओढा कमी आहे. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या ती मंदिरे, मशिदी, लेणी, गडकिल्ले, स्तूप, मनोरे खूप महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षांचा इतिहास या ठिकाणांमध्ये सामावलेला आहे. अशा वारशाचे चांगल्या प्रकारे जतन व्हावे, यासाठी शासनाने व स्थानिक लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्राचीन वारशाचे जतन करण्याची जबाबदारी शासनाची तर आहेच; मात्र त्याचबरोबर तिथल्या स्थानिक नागरिकांनीही त्यांचे काळजीपूर्वक जतन होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. पुरातत्त्व विभागाबरोबरच महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या स्थानिक पातळीवरील शासन संस्थांनी या वास्तूंचे योग्य प्रकारे जतन होईल, यावर भर द्यावा. काही दिवसांपूर्वी मी बहारिनला गेलो होतो. तिथे एका उजाड अशा ठिकाणी एक प्राचीन विहीर होती. त्या विहिरीच्या आजूबाजूला फारसे काही नव्हते. मात्र ती विहीर प्राचीन ठेवा असल्याने शासनाकडून अत्यंत काळजीपूर्वक तिचे जतन करण्यात आले होते. त्या विहिरीची देखरेख करणाऱ्या रखवालदारांसाठी वातानुकूलित केबिन उभारण्यात आल्या होत्या. त्या विहिरीची पडझड होऊ नये, यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. यावरून फारसा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांचे जतन करण्यासाठी बहारिन शासन किती दक्ष होते, याची कल्पना येते. त्याचप्रमाणे आपल्याकडेही पर्यटनप्रिय नसलेल्या प्राचीन वारशांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवा ठेवला आहे, याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना होण्यासाठी या वारशांचे जतन झालेच पाहिजे. जुन्या वास्तू, वाडे या अनेक वर्षांपूर्वीचे वास्तूशास्त्र कसे होते, याचा इतिहास उलगडून दाखवितात. जुनी मंदिरे, तिथली शिल्प हादेखील महत्त्वपूर्ण ठेवा आहे. सातवाहन काळातील तेर गावामध्ये अनेक जुनी देवळे आहेत. त्यातून गावाची प्राचीन परंपरा समोर येते. प्राचीन किल्ले, वास्तू, लेण्यांवर खडूने अथवा कोळशाने लिहून त्या विद्रूप करण्याचा प्रकार टवाळखोर पर्यटकांकडून केला जातो. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यामुळे फारशा प्रसिद्धीस न आलेल्या वास्तू पर्यटकांच्या समोर आणायच्या की नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. शालेयस्तरावरच मुलांना जागतिक वारसा जतन करण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमामध्ये प्राचीन वारसा जतन का केला पाहिजे, याची सविस्तर महिती दिली पाहिजे. अनेक जुन्या वाड्यांमध्ये खूप वर्षे जुन्या वस्तू, शस्त्रे असतात. त्या वस्तूंचे चांगले संग्रहालय करून अधिक चांगल्या पद्धतीने त्या जतन करणे आवश्यक आहे.