शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
5
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
6
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
7
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
9
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
10
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
11
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
12
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
13
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
14
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
15
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
16
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
17
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
18
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
19
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
20
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!

नवी राजकीय व्यवस्था हवी

By admin | Updated: January 23, 2017 03:08 IST

समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची

पुणे : समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची वाट न पाहता नव्या राजकीय व्यवस्थेसाठी जनतेचा सहभाग घ्या, संघर्ष करा, सरकारवर दबाव आणणारी ताकद व्हा, असा संदेश ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख यांनी रविवारी येथे दिला. अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनाच्या समारोपामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. येथील सानेगुरुजी स्मारकाच्या परिसरात दोन दिवस सुरू असलेल्या संमेलनामध्ये नवे समाजवादी युवा पथक निर्माण करण्याचा निश्चय झाला. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय संकटांच्या विविध पैलूंवर देशभरातील आघाडीचे कार्यकर्ते, विचारवंत सहभागी झाले होते. समारोपाच्या सत्रामध्ये सोशॅलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रेमसिंह, मध्य प्रदेशातील कार्यकर्ते डॉ. सुनीलम, समाजवादी नेते डॉ. अभिजित वैद्य, युसूफ मेहरअली युवा बिरादरीच्या गुड्डी व्यासपीठावर होत्या. देशभरातील ५९ संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी संमेलनासाठी उपस्थित होते.डॉ. प्रेमसिंह म्हणाले, ‘‘नवसाम्राज्यवादाचे अपत्य म्हणजे सध्याची हुकूमशाही. नवउदारमतवाद सुरूच राहिला, तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकशाही संपविण्याचे प्रयत्न देशात गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपाला साथ देण्याचे वाढते प्रकार देशभर सुरू आहेत. अशा पक्षांना रोखण्याची जबाबदारी मुस्लिमांवर आहे.’’ डॉ. सुनीलम म्हणाले, ‘‘राष्ट्रसेवा दलाला ८२ वर्षांचा इतिहास आहे. समाजवादी व्यासपीठाच्या स्थापनेच्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्यापासून अरुणा असफअलीपर्यंत १०० युवक होते. आज नवी सुरुवात करताना ३०० कार्यकर्ते एकत्र आले आहेत, ते खूप काही करू शकतात. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढण्याचा संकल्प करून युवकांनी स्वत:चे समाजवादीपण सिद्ध क रावे.’’डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘समाजवादाला आधुनिक स्वरूप देण्याची गरज आहे. आजपर्यंत राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते तयार करत राहिले आणि बाहेर जाऊन कार्यकर्ते वेगवेगळी बिरादरी तयार करीत राहिले. लोकतांत्रिक समाजवादाची प्रक्रिया चालविणाऱ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांनी राहिले पाहिजे. उजव्या विचारधारेचे राजकारण रोखण्याची ताकद याच समाजवादी विचारधारेत आहे.’’ गुड्डी यांनी सूत्रसंचालन केले. भाषणांदरम्यान जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारोंसे, चप्पा चप्पा गुंज उठेगा आझादी के नारोंसे अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले होते.