शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कलांची हवी जोपासना : मोरेश्वर बुवा जोशी; महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:53 IST

कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळाडॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा : प्रकाश ढवळे

पुणे : शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. देव, देश, धर्म यांचा वारसा घेऊन हजारो वर्षांची कीर्तनकारांची, संतांची, शाहिरांची परंपरा आहे. देवाचे अभिवादन आणि समाजाचे जागरण या दोन्ही गोष्टी या कलांमधून साधल्या आहेत. सध्या होणारे पाश्चात्यांचे आक्रमण आणि समाजामध्ये असणाऱ्या बुद्धीभेदाला उत्तर देण्याचे सामर्थ्य या सगळ्या परंपरांमध्ये आहे. अशा कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कीर्तनकार तुकाराममहाराज निंबाळकर, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे, गोंधळी बागुजी रेणके, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते.  चºहोलीकर म्हणाले, एखाद्या परिस्थितीचा गांभीयार्ने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य पोवाड्यामध्ये आहे. आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन घडवण्याचे काम अनेक वर्षे शाहीर करीत आहेत. अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. देश पारतंत्र्यात असताना शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण केले आहे. त्यामुळे शाहिरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.  प्रकाश ढवळे म्हणाले, डॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा. आपल्या कलेतून संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे संस्कृतीचे वारसदार व्हा. गुरुंनी शिकविलेल्या कलेकडे गांभीयार्ने बघा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पणाची भावना मनामध्ये असेल तर विद्या प्राप्त होईल. शाहिरी करण्यासाठी प्रतिभाशक्ती, अभिनयकौशल्य, लेखन, स्मरणशक्ती, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण हे गुण असावे लागतात. शाहिरी ही शिवाजीमहाराजांची सेवा आहे, त्यामुळे ती केवळ स्नेहसंमेलनापुरती मर्यादित ठेवू नका.ह्ण आदिती कालेकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे