शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

कलांची हवी जोपासना : मोरेश्वर बुवा जोशी; महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:53 IST

कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळाडॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा : प्रकाश ढवळे

पुणे : शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. देव, देश, धर्म यांचा वारसा घेऊन हजारो वर्षांची कीर्तनकारांची, संतांची, शाहिरांची परंपरा आहे. देवाचे अभिवादन आणि समाजाचे जागरण या दोन्ही गोष्टी या कलांमधून साधल्या आहेत. सध्या होणारे पाश्चात्यांचे आक्रमण आणि समाजामध्ये असणाऱ्या बुद्धीभेदाला उत्तर देण्याचे सामर्थ्य या सगळ्या परंपरांमध्ये आहे. अशा कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कीर्तनकार तुकाराममहाराज निंबाळकर, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे, गोंधळी बागुजी रेणके, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते.  चºहोलीकर म्हणाले, एखाद्या परिस्थितीचा गांभीयार्ने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य पोवाड्यामध्ये आहे. आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन घडवण्याचे काम अनेक वर्षे शाहीर करीत आहेत. अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. देश पारतंत्र्यात असताना शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण केले आहे. त्यामुळे शाहिरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.  प्रकाश ढवळे म्हणाले, डॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा. आपल्या कलेतून संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे संस्कृतीचे वारसदार व्हा. गुरुंनी शिकविलेल्या कलेकडे गांभीयार्ने बघा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पणाची भावना मनामध्ये असेल तर विद्या प्राप्त होईल. शाहिरी करण्यासाठी प्रतिभाशक्ती, अभिनयकौशल्य, लेखन, स्मरणशक्ती, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण हे गुण असावे लागतात. शाहिरी ही शिवाजीमहाराजांची सेवा आहे, त्यामुळे ती केवळ स्नेहसंमेलनापुरती मर्यादित ठेवू नका.ह्ण आदिती कालेकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे