शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:31 IST

देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते देशात काँग्रेसबद्दल द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीही होणार नाही. देशाला आज आणि पुढेही काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे बुधवारी आयोजित स्नेहमेळाव्यास शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंसह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

पवार म्हणाले, मी २४ वर्षांनंतर या वास्तूत आलो, याचा आनंद आहे. प्रत्यक्षात पुण्यात काँग्रेसची स्थापना होणार होती. मात्र, प्लेगमुळे पुण्यातील बैठक रद्द करून ती मुंबईला झाली. स्वातंत्र्यानंतर पुण्यातून प्रदेश काँग्रेसचे काम चालत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे. 

काही जण काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात; परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही. भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस सोबत हवी. आजच्या सत्तेचा विचार देशात विषमतेला खतपाणी घालणारा आहे. एकत्र येऊन या शक्तीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार