शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:31 IST

देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते देशात काँग्रेसबद्दल द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीही होणार नाही. देशाला आज आणि पुढेही काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे बुधवारी आयोजित स्नेहमेळाव्यास शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंसह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

पवार म्हणाले, मी २४ वर्षांनंतर या वास्तूत आलो, याचा आनंद आहे. प्रत्यक्षात पुण्यात काँग्रेसची स्थापना होणार होती. मात्र, प्लेगमुळे पुण्यातील बैठक रद्द करून ती मुंबईला झाली. स्वातंत्र्यानंतर पुण्यातून प्रदेश काँग्रेसचे काम चालत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे. 

काही जण काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात; परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही. भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस सोबत हवी. आजच्या सत्तेचा विचार देशात विषमतेला खतपाणी घालणारा आहे. एकत्र येऊन या शक्तीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार