शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:31 IST

देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते देशात काँग्रेसबद्दल द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीही होणार नाही. देशाला आज आणि पुढेही काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे बुधवारी आयोजित स्नेहमेळाव्यास शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंसह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

पवार म्हणाले, मी २४ वर्षांनंतर या वास्तूत आलो, याचा आनंद आहे. प्रत्यक्षात पुण्यात काँग्रेसची स्थापना होणार होती. मात्र, प्लेगमुळे पुण्यातील बैठक रद्द करून ती मुंबईला झाली. स्वातंत्र्यानंतर पुण्यातून प्रदेश काँग्रेसचे काम चालत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे. 

काही जण काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात; परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही. भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस सोबत हवी. आजच्या सत्तेचा विचार देशात विषमतेला खतपाणी घालणारा आहे. एकत्र येऊन या शक्तीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार