शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२ हजाराची नोट चलनातून मागे; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लहरी माणसाने...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 19:52 IST

Sharad Pawar on Withdrawal of 2000 Rupee Note: आम्ही काही वेगळे करतो असे दाखवायचे. पण नोटबंदीमुळे अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्ध्वस्त झाले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar on Withdrawal of 2000 Rupee Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. २ हजारांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर देशभरात चर्चा सुरू असून, विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. 

एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला गेला आहे. नोटबंदीबाबत काही तक्रार आलीच तर विरोध कमी होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी जो ताजा निर्णय घेतलाय तो एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत असा घेतलेला दिसतोय. मागे अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर त्यात खूप लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकेत त्या काळात काही कॅश होती. काही कोटींमधील ही रक्कम बदलून देण्याची जबाबदारी असताना ती बदलून दिली गेली नाही. पुणे जिल्हा बँकेचे त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले, असेच कोल्हापूरच्या मध्यवर्ती बँकेचेही झाले, असे शरद पवार यांनी सांगितले. 

अनेक कुटुंब आणि व्यावसायिक उद्ध्वस्त झाले

शरद पवार पुढे म्हणाले की, म्हणजे निर्णय घ्यायचे आणि हे निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांना बदल करुन द्यायची जबाबदारी पाळायची नाही. आम्ही काही वेगळे करतो असे दाखवायचे. सुरुवातीच्या काळात असे सांगण्यात आले या नोटा संध्याकाळपासून बंद होतील आणि देशात चमत्कार होईल. पण देशात चमत्कार एवढाच झाला की, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्ध्वस्त झाले. हे चमत्कार केल्यानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे. बघुया याचे पुढे काय होते, या शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार