शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

नाझरेची पाणीक्षमता घटली

By admin | Updated: May 9, 2017 03:35 IST

नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या क्षेत्राला नियोजनातून पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र जलाशयात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने सुमारे ५० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठा कमी झालेला आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या जलाशयावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी योजना व शेती सिंचन योजनांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. जलाशयातील गाळ काढण्याची मागणी होत आहे. १९७२च्या दुष्काळात जेजुरीनजीक पुरंदर व बारामती तालुक्यातील सुमारे ३१९५ हेक्टर शेत जमिनीच्या सिंचनासाठी व परिसरातील खेड्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी नाझरे जलाशयाची निर्मिती झाली. सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमतेचे जलाशयात १९७४ पासून पाणीसाठा होऊ लागला. हे जलाशय कऱ्हा नदीवर बांधलेले असल्याने व जलाशयाचे पाणलोट क्षेत्र हे उथळ असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ ही जलाशयात येत आहे. या साठलेल्या गाळामुळे जलाशयाचा पाणीसाठा कमी कमी होऊ लागला आहे. आजमितीला जलाशयात साधारपणे १० क्युबिक मीटर एवढा गाळ असू शकतो, असा अंदाज आहे. यामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यापैकी सुमारे ५० दशलक्ष घनफुट पाणीसाठा कमीच झालेला आहे. मध्यंतरी सन २०१२-१३ साली खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महात्मा फुले जलसंधारण अभियानातून या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. लोकसहभागातून यावेळी सुमारे साडेचार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात ही २० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमता असणाऱ्या या जलाशयावरून जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक वसाहत, आय.एस.एम.टी. कंपनी, तसेच पुरंदर व बारामती तालुक्यातील ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून होत आहे. याशिवाय शेती सिंचनही मोठ्या प्रमाणावर होत असते.