शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

हिरा ग्रुपची संचालिका नवहिरा शेखला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 01:55 IST

एक कोटी ६५ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणात हैराबाद येथील नामांकित हिरा ग्रुप्स कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिलेला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

पुणे : गोल्ड ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास वार्षिक ३५ टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून १४ जणांची एक कोटी ६५ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणात हैराबाद येथील नामांकित हिरा ग्रुप्स कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिलेला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.नवहिरा नन्हेसाहेब शेख (वय ५४, रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. तिला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी दिला. तिचे दोन साथीदार दाऊद मेहबूब खान (वय ६५, रा. कॅम्प) व रेहान शेख (वय ५०, रा. रविवार पेठ) यांच्यावरदेखील फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९नुसार गुन्हा दाखल केला आहे. मखदूम हाजी मोहंमद गौस सिद्दीबिलाल (वय ६७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीबिलाल व इतर १४ ठेविदारांना आरोपींनी हिरा गोल्ड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर वार्षिक ३५ टक्के परतावा व सदरचा परताव्यातील काही रक्कम प्रतिमहिना देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून ५ लाख रुपये व त्यांच्या कुटुंबातील इतर चार जणांकडून १२ लाख रुपये, असे एकूण १७ लाख रुपये व इतर १० जणांकडून वेळोवेळी एक कोटी ४८ लाख रुपये, असे एकूण १ कोटी ६५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील मिळणारे फायदे आणि परतावा न करता त्याचा अपहार केला. शेख हिच्यावर नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध शहरांत गुन्हे दाखल आहेत. गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यवधी रुपये तिने विविध ठिकाणी गुंतवले असून त्याबाबत तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात किती जणांचा समावेश आहे, याबाबत माहिती घ्यायची आहे.फसवणूक करून मिळविलेली रक्कम कोठे ठेवण्यात आली अथवा तिचा कोठे वापर केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे तिला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील जावेद खान यांनी केली. बचाव पक्षाचे वकील रहमान शेख यांनी युक्तिवात केला, की शेख यांना कोणत्याही गुंतवणूकदारांचे पैसे बुडवयाचे नसून त्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, त्यांची सर्व बँक खाती, लॅपटॉप, मोबाईल नवी मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच सील केल्याने त्यांना पैशांची परतफेड करता येत नाही.