शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

हिरा ग्रुपची संचालिका नवहिरा शेखला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 01:55 IST

एक कोटी ६५ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणात हैराबाद येथील नामांकित हिरा ग्रुप्स कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिलेला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

पुणे : गोल्ड ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास वार्षिक ३५ टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून १४ जणांची एक कोटी ६५ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणात हैराबाद येथील नामांकित हिरा ग्रुप्स कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिलेला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.नवहिरा नन्हेसाहेब शेख (वय ५४, रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. तिला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी दिला. तिचे दोन साथीदार दाऊद मेहबूब खान (वय ६५, रा. कॅम्प) व रेहान शेख (वय ५०, रा. रविवार पेठ) यांच्यावरदेखील फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९नुसार गुन्हा दाखल केला आहे. मखदूम हाजी मोहंमद गौस सिद्दीबिलाल (वय ६७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीबिलाल व इतर १४ ठेविदारांना आरोपींनी हिरा गोल्ड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर वार्षिक ३५ टक्के परतावा व सदरचा परताव्यातील काही रक्कम प्रतिमहिना देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून ५ लाख रुपये व त्यांच्या कुटुंबातील इतर चार जणांकडून १२ लाख रुपये, असे एकूण १७ लाख रुपये व इतर १० जणांकडून वेळोवेळी एक कोटी ४८ लाख रुपये, असे एकूण १ कोटी ६५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील मिळणारे फायदे आणि परतावा न करता त्याचा अपहार केला. शेख हिच्यावर नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध शहरांत गुन्हे दाखल आहेत. गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यवधी रुपये तिने विविध ठिकाणी गुंतवले असून त्याबाबत तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात किती जणांचा समावेश आहे, याबाबत माहिती घ्यायची आहे.फसवणूक करून मिळविलेली रक्कम कोठे ठेवण्यात आली अथवा तिचा कोठे वापर केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे तिला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील जावेद खान यांनी केली. बचाव पक्षाचे वकील रहमान शेख यांनी युक्तिवात केला, की शेख यांना कोणत्याही गुंतवणूकदारांचे पैसे बुडवयाचे नसून त्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, त्यांची सर्व बँक खाती, लॅपटॉप, मोबाईल नवी मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच सील केल्याने त्यांना पैशांची परतफेड करता येत नाही.