शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

National Youth Day : अक्षरांची ओळख करून देणारा आमीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 14:50 IST

वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. 

पुणे : वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. 

          लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे हे उमजत नाही. तसेच आवडेचे साहित्य कोठून मिळवायचे हेही माहिती नसते. वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दुवा होण्याचे काम अक्षरमित्र ही चळवळ करीत आहे. शालेय स्तरातील मुलांना उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तके, नियतकालिकेपोचवणे आणि त्यांना पडणा-या प्रश्नांना उत्तरे देणे हे या चळवळीचे उद्देश. अक्षरमित्रचे काम चालू केले त्यावेळी अमीरचे वय अवघे १९ होते. त्यावेळी तो तो मेडिकलची सीटसोडून नगरमध्ये आला होता. काय करावे हे माहिती नव्हते पण काय करायचे नाही हे त्याने पक्के  केले होते. पुस्तकांच्या आवडीतून आणि सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीकडे पाहून त्याला अक्षरमित्रची कल्पना सुचली होती. पार्टटाईम म्हणून काम सुरू केले तेव्हा चुका करण्याच्या हाच आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चुका (प्रयोग) करा आणि शिका असा पवित्रा अक्षरमित्र सुरू करताना त्याने घेतला. त्यामुळे पार्टटाइम म्हणून सुरू केलेली गोष्ट फुलटाईम कधी झाली हे त्याला कळलेच नाही. आमीर ध्यास घेऊन कामाला लागला खरा. मात्र सुरुवातीला त्याला पुस्तके कोठून मिळवायची हेही ठाऊक नव्हते. पुण्यात प्रकाशन संस्था अधिक असल्याने नगरहून तो पुण्यात येऊ लागला. सुरुवातीला त्यातील गणित कळत नव्हते. प्रकाशकही फारसे दाद देईनात, तरीही त्याने चिकाटी सोडली नाही. तो शहरातील एका प्रकाशन संस्थेतून दुस-या प्रकाशन संस्थेकडे फिरत राहीला, नवीन माहिती मिळेल तिकडे धाव घेत असे. त्याच्यावर साधना साप्ताहिकाने सर्वांत पहिल्यांदा विश्वास टाकला.  

      हे सर्व सुरू असताना शिक्षणही चालू होतेच. असंघटितपणे काम करीत असताना तो एका अशा टप्प्यावर आलो होतो की आता अत्यंत संघटीत पद्धतीने मोठी सुरूवात करायची आहे. त्या काळात काही कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली एक संधी चालून आली. तेव्हा त्याच्या मनात काय घटले याबाबत अमीरने सांगितले की, मी जे करायला चाललो आहे. त्याचसाठी ही सुरुवात केली होती ना? आणि मग लक्षात आले की, आपल्याला पुस्तक विक्रीमधील ब्रँड व्हायचे नाहीये. शिक्षणामध्ये मूलभूत संशोधन आणि काम व्हावे आणि नोकरीसाठी, पैशांसाठी शिक्षण यावरून मुल्यांसाठी, जगण्यासाठी शिक्षण असा प्रवास व्हावा. हाच कामाचा उद्देश होता.

               डॉ. अनिल सन्दोपालन, अरविंद गुप्ता, एकलव्य भोपाळसारख्या संस्था आमच्या आदर्श स्थानी होत्या. सध्या आहे तो प्रवास थांबवून एक नवा प्रवास सुरू झाला आहे. पुस्तक आणि सिनेमा यांना घेऊन काम करायचे आहे. त्यामुळे पून्हा नवीन अक्षरमित्र घेऊन येण्याचा मानस आहे. सध्या देशभर फिरतोय, लोकांमधे जाऊन राहून त्यांना समजून घेतोय, वाचतोय, जगभरातील सिनेमा सोबत आहेच. हेच आता माझं विद्यापीठ आहे. हीच शिकण्याची माझी पद्धत आहे. कुठे जाणार हे माहिती नाही ते मी ठरवतही नाही. मुक्कामापेक्षा मला प्रवास महत्त्वाचा वाटतोय, आणि त्या प्रवासाचा मी आनंद घेतोय.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकsocial workerसमाजसेवक