शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:42 IST

डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळाउत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे : के. पी. विश्वनाथन

पुणे : साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीमध्ये सरकारकडून शेतकरी आणि साखर उत्पादकांना दुय्यम स्थान दिले जाते. साखरेचे दर स्थिर राहत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या बाजारपेठेतील परिस्थिती भीतीदायक असून तंत्रज्ञानाच्या सहकार्याशिवाय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पादन होणार नाही. ऊस लागवडीचा खर्च कमी होऊन उतारा वाढला, तरच साखर कारखाने स्थिर स्थावर होतील, असे मत साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथन, नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नागवडे म्हणाले, की ऊस उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांचे पाठबळ मिळाले पाहिजे. घरगुती वापरासाठी स्वस्त दरात साखर उपलब्ध व्हावी, असे कारण देऊन साखरेचे दर नियंत्रणात ठेवले जातात. प्रत्यक्षात मात्र देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण साखरेपैकी केवळ साधारणपणे २५ ते ३० टक्के साखर घरगुती कारणासाठी वापरली जाते, तर उर्वरीत ७० ते ७५ टक्के साखरेचा वापर अन्य उद्योगांसाठी केला जातो. हे अन्य उद्योजक कमी दरातील साखर खरेदी करुन अमाप नफा कमवतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या पैश्यांसाठी आंदोलने करावी लागतात, ही परिस्थिती बदलली पाहिजे. विश्वनाथन म्हणाले, की प्रती हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही स्पर्धा केवळ पारितोषिकापुरती ठिक आहे. मात्र, या स्पर्धेपेक्षा आपण शाश्वत विकासासाठी, जागतिक पातळीवर टिकण्यासाठी उत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणे