शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:42 IST

डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळाउत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे : के. पी. विश्वनाथन

पुणे : साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीमध्ये सरकारकडून शेतकरी आणि साखर उत्पादकांना दुय्यम स्थान दिले जाते. साखरेचे दर स्थिर राहत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या बाजारपेठेतील परिस्थिती भीतीदायक असून तंत्रज्ञानाच्या सहकार्याशिवाय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पादन होणार नाही. ऊस लागवडीचा खर्च कमी होऊन उतारा वाढला, तरच साखर कारखाने स्थिर स्थावर होतील, असे मत साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. डी. जी. हापसे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथन, नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नागवडे म्हणाले, की ऊस उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांचे पाठबळ मिळाले पाहिजे. घरगुती वापरासाठी स्वस्त दरात साखर उपलब्ध व्हावी, असे कारण देऊन साखरेचे दर नियंत्रणात ठेवले जातात. प्रत्यक्षात मात्र देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण साखरेपैकी केवळ साधारणपणे २५ ते ३० टक्के साखर घरगुती कारणासाठी वापरली जाते, तर उर्वरीत ७० ते ७५ टक्के साखरेचा वापर अन्य उद्योगांसाठी केला जातो. हे अन्य उद्योजक कमी दरातील साखर खरेदी करुन अमाप नफा कमवतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या पैश्यांसाठी आंदोलने करावी लागतात, ही परिस्थिती बदलली पाहिजे. विश्वनाथन म्हणाले, की प्रती हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही स्पर्धा केवळ पारितोषिकापुरती ठिक आहे. मात्र, या स्पर्धेपेक्षा आपण शाश्वत विकासासाठी, जागतिक पातळीवर टिकण्यासाठी उत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणे