शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'मोदींना अदानीला तर आम्हाला भारताला नंबर वन करायचे आहे'; संजय सिंह यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 12:59 IST

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांची भाजपवर टीका

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे मित्र अदानी यांना जगातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत बनवायचे आहे, तर आम्हाला भारताला जगात पहिल्या क्रमाकांचे देश करायचे आहे. त्यांच्या व आमच्या आर्थिक संरचनेत हाच प्रमुख फरक आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे (आप) खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झालेले सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

खासदार सिंह म्हणाले, सत्तेवर येण्याआधी त्यांनी आम्ही २ कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू, असे सांगितले होते. मागील ७ वर्षांत देशात फक्त ७ लाख रोजगार निर्मिती झाली, ही त्यांनीच संसदेत दिलेली अधिकृत आकडेवारी आहे. काहीशे कोटी रुपयांची कर्जे घेऊन अनेक उद्योगपती देश सोडून फरारी झाले. त्यांची कर्जे सरकारने माफ केली. ती वसुली आता जनतेकडून विविध कर बसवून केली जात आहे. खाण्याच्या जीवनावश्यक पदार्थांवरसुद्धा मोदी सरकारने कर लावला आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिरात खासदार सिंह यांची जाहीर सभा शुक्रवारी दुपारी झाली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार, तसेच महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष राचुरे यांनी यावेळी केंद्र सरकारजवळ कसलीही नीती नसल्याची टीका केली. विजय कुंभार, महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन यांचीही यावेळी भाषणे झाली. आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असे स्पष्ट केले. मात्र, आपचे धोरण, आपचे कामकाज आपल्याला पटत असल्यानेच त्यांच्या व्यासपीठावर येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानीAAPआप