शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘नाव छापले’..पण.... राज ठाकरेंना आमंत्रणच मिळाले नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 18:20 IST

कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात ‘त्यांनी ’ आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले... 

ठळक मुद्देतो कलेचा प्रेमी आहे. आयोजकांनी योग्य समन्वय साधला असता तर कदाचित तो आला असता.

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव छापले खरे पण त्यांना आमंत्रणच पोहोचले नसल्याने इच्छा असूनही त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही...योग्य समन्वय साधता आला असता तर ते येऊ शकले असते , असा राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीबददल खुलासा करत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले... बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा विशेष उपस्थितीमध्ये ‘नाटयसंमेलनाध्यक्ष’असा उल्लेख न करता नांदी: कीर्ती शिलेदार आणि सहकारी’असा करण्यात आल्याने आयोजकांनी यापूर्वीच कीर्तीताईंचा रोष ओढवून घेतला होता. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने या कार्यक्रमाला त्यांनी गैरहजेरी लावली. यातच भर म्हणून की काय? राज ठाकरे यांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव छापले पण त्यांना आमंत्रणच पोहोचले नसल्याने ते उद्घाटनाला येऊ शकले नाहीत असा गौप्यस्फोट आगाशे यांनी केल्याने आयोजकांचे ढिसाळ नियोजन उघडे पडले. आगाशे म्हणाले, पत्रिकेमध्ये राज ठाकरे यांचे नाव छापले आहे. मात्र, ते नाव छापूनही ते का येऊ शकले नाहीत याबाबत रसिकांचा गैरसमज होऊ नये म्हणून राज यानेच मला हा खुलासा करायला सांगितला आहे. या कार्यक्रमाला यायची त्याची खूप इच्छा होती. परंतु, त्याच्यापर्यंत आमंत्रणच पोहोचले नाही. तो कलेचा प्रेमी आहे. आयोजकांनी योग्य समन्वय साधला असता तर कदाचित तो आला असता. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कान टोचले.

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरRaj Thackerayराज ठाकरेMohan Agasheमोहन आगाशे