शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

Video: आरारारा..! सेलिब्रेशनच्या नावाखाली मित्रांनी केला 'बर्थ डे बॉय'वर अंड्यांचा तुफान मारा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 15, 2020 18:26 IST

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुणे : वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या नव्या पद्धतीसमोर येत आहे.रस्त्यावर तलवारीने, कोयत्याने यांनी केक कापत धिंगाणा घातल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. काहीजणांवर पोलीस गुन्हा देखील दाखल केले जातात. मात्र असे भयानक प्रकार थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अशाच  प्रकारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे काही तरुणांनी आपल्या मित्राचा अजब-गजब प्रकारे वाढदिवस साजरा केला. पण हा धिंगाणा 'बर्थ डे बॉय' सह त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे. 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सकलेन नासिर शेख याचा नुकताच १८ वा वाढदिवस होता. यावेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी केक कापल्यानंतर जमलेल्या त्याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून मारत परिसरात चांगलाच धुडगुस घातला. नारायणगाव पोलिस ठाण्यात बर्थ डे बॉय आणि त्याच्या ६ मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिर परिसरात सकलेन व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. ;पण त्यानंतर काहीच वेळात सकलेनच्या मित्रांनी त्याला जोरजोऱ्यात अंडी फेकून मारण्यास सुरुवात केली.  या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या तरुणांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. (सर्व रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशी आहेत. नारायणगाव पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड यांनी या धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वाढदिवस साजरा करण्याच्या 'हटके' स्टाईलच्या नावाखाली पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तलवारी,कोयते यांच्या साह्याने केक कापण्याच्या घटना प्रमाणात घडत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात तरी ती अशा घटनांना रोखण्यात कमी पडत आहे. या  वाढदिवस साजरा करण्यापाठीमागे परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असतो.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,औरंगाबाद यांसारख्या मोठं मोठ्या शहरापुरते मर्यादित असलेले असे भयानक प्रकार आता गाव व तालुका पातळीवर सुरु झाले आहे. पोलिसांनी लवकर जर अशा प्रवृत्तींना आळा घातला नाहीतर समाज जीवन धोक्यात येणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर खाकी वर्दीची जरब बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस