शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

Video: आरारारा..! सेलिब्रेशनच्या नावाखाली मित्रांनी केला 'बर्थ डे बॉय'वर अंड्यांचा तुफान मारा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 15, 2020 18:26 IST

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुणे : वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या नव्या पद्धतीसमोर येत आहे.रस्त्यावर तलवारीने, कोयत्याने यांनी केक कापत धिंगाणा घातल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. काहीजणांवर पोलीस गुन्हा देखील दाखल केले जातात. मात्र असे भयानक प्रकार थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अशाच  प्रकारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे काही तरुणांनी आपल्या मित्राचा अजब-गजब प्रकारे वाढदिवस साजरा केला. पण हा धिंगाणा 'बर्थ डे बॉय' सह त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे. 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सकलेन नासिर शेख याचा नुकताच १८ वा वाढदिवस होता. यावेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी केक कापल्यानंतर जमलेल्या त्याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून मारत परिसरात चांगलाच धुडगुस घातला. नारायणगाव पोलिस ठाण्यात बर्थ डे बॉय आणि त्याच्या ६ मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिर परिसरात सकलेन व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. ;पण त्यानंतर काहीच वेळात सकलेनच्या मित्रांनी त्याला जोरजोऱ्यात अंडी फेकून मारण्यास सुरुवात केली.  या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या तरुणांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. (सर्व रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशी आहेत. नारायणगाव पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड यांनी या धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वाढदिवस साजरा करण्याच्या 'हटके' स्टाईलच्या नावाखाली पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तलवारी,कोयते यांच्या साह्याने केक कापण्याच्या घटना प्रमाणात घडत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात तरी ती अशा घटनांना रोखण्यात कमी पडत आहे. या  वाढदिवस साजरा करण्यापाठीमागे परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असतो.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,औरंगाबाद यांसारख्या मोठं मोठ्या शहरापुरते मर्यादित असलेले असे भयानक प्रकार आता गाव व तालुका पातळीवर सुरु झाले आहे. पोलिसांनी लवकर जर अशा प्रवृत्तींना आळा घातला नाहीतर समाज जीवन धोक्यात येणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर खाकी वर्दीची जरब बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस