शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

आकाशच्या हत्येचे गूढ कायम

By admin | Updated: January 5, 2015 23:16 IST

कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील आकाश संदीप महाळुंगकर या १३ वर्षांच्या मुलास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील आकाश संदीप महाळुंगकर या १३ वर्षांच्या मुलास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.७२ तास उलटूनही अद्याप पोलिसांच्या हातात आरोपींचा कुठलाही सुगावा लागलेला नाही. त्याच्या हत्येचे गूढ अद्याप कायम आहे. आरोपी अद्याप मोकाटच असून आरोपींना त्वरित पकडून कारवाई करण्याची मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्या, सरपंच रत्नमाला गाळव, माजी सरपंच कैलास गाळव, नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोरेगाव खुर्द येथील टोकवाडी वस्तीवरील आकाश महाळुंगकर हा घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर शौचाला गेला असता दोन अज्ञात तरुणांनी त्यास पकडून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आकाशने आरडाओरडा केल्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी त्यास विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत आकाश ९० टक्के भाजला होता. काल सायंकाळी ६ च्या सुमारास आकाशची ससून रुग्णालयात उपचार चालू असताना प्राणज्योत मालवली. आकाशच्या मृत्यूमुळे कोरेगाववर शोककळा पसरली असून आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाकणचे पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली आळंदीचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम, हवालदार अनंता शिंदे, एम. एम. शेख, राजेश मोहिते, राजेंद्र कोणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस अधिकारी व महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा मंगल देवकर, सदस्या रमा हुलावळे व शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड यांनी घटनास्थळाची पाहणी करून आकाशची आई, बहीण व शिक्षक यांच्याकडे आकाशच्या वर्तणुकीची चौकशी करून आरोपींना त्वरित पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही गोष्टी संशयास्पद वाटत असून आकाशच्या मारेकऱ्यांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनेबाबत मात्र गावात उलटसुलट चर्चा असल्याचे चित्र आज दिवसभर गावात दिसत होते. (वार्ताहर)