शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जाळपोळ प्रकरणामागील गूढ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2015 03:47 IST

सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले

पुणे : सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले असून, या प्रकरणातील गूढ वाढतच चालले आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना ‘हे कृत्य माथेफिरूचे वाटत नाही; तो पूर्वनियोजित कट असावा,’ असे वक्तव्य केले असून, आरोपीचा मागमूस नसल्याचे स्पष्ट केले आहे. जाळपोळीचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. जाळपोळ प्रकरण झाल्यानंतरच्या सायंकाळी याच भागात झालेल्या खून प्रकरणातील माथेफिरू आरोपीचे साम्य सीसी टीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या संशयिताशी असावे, या दाट निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत, असे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी सांगितले होते. पाठक यांच्या खुलाशामुळे कालचा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. ठेकेदारीच्या कामातील पैशांच्या वादावरून हा खून झाला होता. विनोद जमदाडे याचे आणि सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितांमध्ये बरेच साम्य आहे. त्या संशयिताने जीन्स पंट आणि टी शर्ट परिधान केलेला आहे, जमदाडे याच्या अंगावर तसेच कपडे असून तो सतत दारूच्या नशेत असतो.त्याच्याकडे चौकशी सुरू असून त्यानेच हा प्रकार केला असावा, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही ९९ टक्के आलो आहोत, असे रामानंद यांनी नमूद केले होते. पाठक यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट होत असून, कांबळे यांचे २४ तासांत आरोपीला पकडू, हे आश्वासनही विरले आहे. सामान्य नागरिकांत मात्र या प्रकारामुळे संताप वाढीस लागला आहे. (प्रतिनिधी)सिंहगड रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझ्झा या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलींना व परिसरातील सनसिटी रस्त्यावरच्या निर्मल टाऊनशिपमधील सूर्यनगरी, स्वामी नारायण, अवधूत, अक्षय ग्लोरी या सोसायट्यांमधील दुचाकी व चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ आग लावून समाजकंटक पसार झाला. रविवारी पहाटे तीन ते साडेचारदरम्यान एक ते दीड किलोमीटरच्या पट्ट्यात झालेल्या या भीषण दुर्घटनेत, आगीच्या ५ घटनांत ८४ दुचाकी व ६ चारचाकी वाहने खाक झाली.