शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

विविध पक्षांची अनाकलनीय युती

By admin | Updated: August 7, 2015 00:45 IST

पुरंदरमधील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी कोठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. गावपातळीवर गावकी-भावकी, वेगवेगळ्या

सासवड : पुरंदरमधील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी कोठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. गावपातळीवर गावकी-भावकी, वेगवेगळ्या पक्षांची अनाकलनीय युती यांमुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाने ग्रामपंचायत ताब्यात घेतली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तालुक्यातील काही मोजक्या गावांतील पुढाऱ्यांनी आपापली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. बऱ्याच गावांतून सदस्यसंख्या जास्त असूनही सरपंचपदाच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतीवर वेगळ्याच पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. नायगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या ५, तर शिवसेनेच्या पदरात ४ जागा पडल्या आहेत. कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयराव कोलते यांनी त्यांच्या गावची ग्रामपंचायत काँग्रेसच्या मदतीने ८ जागा जिंकून कायम ठेवली असली, तरी विरोधकांच्या ३ जागांवर मात्र त्यांना पाणी सोडावे लागले. नायगाव आणि पिसर्वे येथे आरक्षणामुळे सरपंचपद मात्र विरोधकांच्या पारड्यात पडले आहे. पश्चिम भागातील जिल्हा परिषद सदस्य व कात्रज दूध संघाचे सदस्य गराडेचे गंगाराम जगदाळे यांनी मनसेच्या माध्यमातून ७ जागा जिंकून जरी आघाडी घेतली असली, तरी विरोधकांनी ४ जागा जिंकण्याची किमया केली आहे. गेल्या निवडणुकीत गंगाराम जगदाळे यांनी ११ विरुद्ध १ अशी बाजी मारली होती. नीरा या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांपैकी काकडे गटाने ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले असले, तरी सरपंचपदाच्या उमेदवारासह ६ जागा जिंकून चव्हाण गटाने वरकडी केली आहे. हरगुडे ग्रामपंचायतीत भूषण ताकवले यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ४ जागा जिंकून विरोधकांना केवळ ३ जागा दिल्या आहेत. दिवे या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विरोधात अन्य सर्व पक्षीय आघाडी अशा रंगलेल्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना ७-७ जागा आणि प्रत्येक गटाच्या एका उमेदवाराला समसमान मते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडली. भिवडीत ११ जागांपैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला ६, तर शिवसेनेसह अन्य पक्षांच्या आघाडीला ५ जागा मिळाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सतीश गायकवाड आणि विरोधी गटाचे संदीप पवार या दोघांनाही समान मते पडली असता, पोस्टल मतदानाच्या आघाडीवर सतीश गायकवाड यांचा विजय निश्चित करण्यात आला.दरम्यान, आज सकाळी ९ वाजता दिवे येथील आयटीआय केंद्रात मतमोजणीला प्रारंभ झाला. १८ टेबलांवर यापूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार ३ ते ४ गावांची एका वेळी मतमोजणी करण्यात आली. त्याअनुषंगाने त्या गावचे उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आल्यामुळे कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही. निवडणूक निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेरील रस्त्यावर मात्र कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत पक्षांचे झेंडे मिरवत मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील, सहायक अधिकारी सुनंदा भोसले-पाटील, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.खळद, परिंचे आणि यादववाडी-सटलवाडी, मांडकी, तोंडल, पिसुरटी, हरगुडे, पिसे, राख, नावळी या गावांतून शिवसेनेने बाजी मारल्याचे समजते; तर पिसर्वे, गुऱ्होळी, दिवे, हरणी, काळदरी, नाझरे क.प., नाझरे सुपे, साकुर्डे, पिंगोरी, पांडेश्वर आदी ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या विचाराच्या झाल्याचे समजते. हिवरे, टेकवडी, मावडी क.प., माहूर, देवडी, कोळविहिरे, कोडीत, नारायणपूर, नीरा, शिवरी, पिंपरे खुर्द, लपतळवाडी, धालेवाडी, पानवडी आदी ग्रामपंचायतींत काँग्रेसची सरशी झाल्याचे समजते. दरेवाडी तालुका पुरंदर येथील निखिल वाडकर या लहान मुलाने रामदास गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी काढली. तसेच, बोपगाव येथील निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला ४, तर शिवसेना-मनसे आघाडीला ४ जागा मिळाल्याने येथेही चिठ्ठीद्वारे वनिता जगदाळे या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यात आला; परंतु दोन्ही गटांनी मतमोजणी केंद्रावरच एकत्रित येऊन सरपंचपदाची धुरा दोघांनीही अडीच-अडीच वर्षे सांभाळण्याचा निर्णय घेतला. योगेश फडतरे, दीपक फडतरे, दयानंद फडतरे, संदीप फडतरे आदींनी याबाबत विशेष पुढाकार घेतला.