शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हा आहे मुस्लिम महिलांचा जाहीरनामा : वाचा सविस्तर मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:18 IST

तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे.

पुणे : तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. मुस्लिम महिला संविधान हक्क परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या मुस्लिम महिला मतदारांच्या जाहीरनाम्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत. 

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्षांतर्फे विकासाची, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची आश्वासने दिली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिला संविधान हक्क परिषदेतर्फे जाहीरनाम्यातून मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षा रझिया पटेल यांच्यासह कुदसिया अंजुम, सबीहा हुसेन, तनवीर तसब्दीन, नजमा शेख यांनी महिलांच्या मागण्या आणि प्रश्न मांडले आहेत. जाहीरनाम्यातील मागण्यांचा विचार करुन त्याबाबत दीर्घकालीन धोरण आखण्यात यावे, असे आवाहन केले आहे. भय आणि द्वेषाचे, मंदिर-मशिदीचे राजकारण थांबवले जावे, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण, सुरक्षितता, रोजगार, रुढी-परंपरा आणि कायदे याबाबतीत मुस्लिम महिलांना आजही झगडावे लागत आहे. तोंडी तलाक विधेयकाला नागरी कायद्याऐवजी फौैजदारी कायदा करुन सोडवण्याचा प्रयत्न हा मुस्लिम महिलांना न्याय न देता समाजाला गुन्हेगार ठरवणारा आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळे मुस्लिम समाज पसरलेले भय, नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता, याबाबत भाष्य करण्यात आले आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा देणा-या सरकारने मुस्लिम समाजाच्या विकासाचा विचारच केला नाही, मुस्लिम समाजाची सतत शत्रू अशी प्रतिमा उभी केली जात आहे, मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि सबलीकरणाचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांनी दीर्घकालीन धोरण आखावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

--------------

मागण्या :

१. तोंडी तलाक विधेयक समीक्षा समितीकडे पाठवले जावे. तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवण्यात यावीत. मुस्लिम महिला प्रश्नांवर पुन्हा स्वतंत्र धर्माधारित कायदे करण्याऐवजी सर्व महिलांना न्याय देणारे कायद्यांतर्गत न्याय दिला जावा.

२. बहुपत्नीत्व, तोंडी तलाक, हलाला, स्त्रियांची सुंता इत्यादी धर्माच्या नावाखाली वापरत असलेल्या रुढी परंपरांविरोधात जेंडर जस्ट लॉ तयार केला जावा.

३. गुजरात, मुज्जफरनगरसारख्या भागांमध्ये दंगलपिडीत मुस्लिम महिलांना आणि समाजाला न्याय मिळावा, यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जावी.

४. मुस्लिम समाजाचा शिक्षण आणि रोजगारात, तसेच मुख्य प्रवाहात समावेश होण्यासाठी सच्चर आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारसी लागू कराव्यात.

५. नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ हे शेजारच्या देशांतून स्थलांतरित हिंदूंना समाविष्ट करते. पण, त्या नावाने देशातील मुस्लिम नागरिकांमध्ये भय निर्माण करते आहे. स्थलांतराचा प्रश्न वापरुन मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणारे आणि हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करणारे हे विधेयक मागे घेतले जावे.

६.मुस्लिम महिलांच्या मुख्य मागण्या या शिक्षण, सुरक्षितता, रोजगार आणि कायदे ह्या आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांनी या मागण्यांचा विचार करुन पाठिंबा दयावा आणि दीर्घकालीन धोरण तयार करावे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीमMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चाVotingमतदान