शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

हा आहे मुस्लिम महिलांचा जाहीरनामा : वाचा सविस्तर मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:18 IST

तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे.

पुणे : तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. मुस्लिम महिला संविधान हक्क परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या मुस्लिम महिला मतदारांच्या जाहीरनाम्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत. 

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्षांतर्फे विकासाची, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची आश्वासने दिली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिला संविधान हक्क परिषदेतर्फे जाहीरनाम्यातून मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षा रझिया पटेल यांच्यासह कुदसिया अंजुम, सबीहा हुसेन, तनवीर तसब्दीन, नजमा शेख यांनी महिलांच्या मागण्या आणि प्रश्न मांडले आहेत. जाहीरनाम्यातील मागण्यांचा विचार करुन त्याबाबत दीर्घकालीन धोरण आखण्यात यावे, असे आवाहन केले आहे. भय आणि द्वेषाचे, मंदिर-मशिदीचे राजकारण थांबवले जावे, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण, सुरक्षितता, रोजगार, रुढी-परंपरा आणि कायदे याबाबतीत मुस्लिम महिलांना आजही झगडावे लागत आहे. तोंडी तलाक विधेयकाला नागरी कायद्याऐवजी फौैजदारी कायदा करुन सोडवण्याचा प्रयत्न हा मुस्लिम महिलांना न्याय न देता समाजाला गुन्हेगार ठरवणारा आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळे मुस्लिम समाज पसरलेले भय, नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता, याबाबत भाष्य करण्यात आले आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा देणा-या सरकारने मुस्लिम समाजाच्या विकासाचा विचारच केला नाही, मुस्लिम समाजाची सतत शत्रू अशी प्रतिमा उभी केली जात आहे, मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि सबलीकरणाचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांनी दीर्घकालीन धोरण आखावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

--------------

मागण्या :

१. तोंडी तलाक विधेयक समीक्षा समितीकडे पाठवले जावे. तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवण्यात यावीत. मुस्लिम महिला प्रश्नांवर पुन्हा स्वतंत्र धर्माधारित कायदे करण्याऐवजी सर्व महिलांना न्याय देणारे कायद्यांतर्गत न्याय दिला जावा.

२. बहुपत्नीत्व, तोंडी तलाक, हलाला, स्त्रियांची सुंता इत्यादी धर्माच्या नावाखाली वापरत असलेल्या रुढी परंपरांविरोधात जेंडर जस्ट लॉ तयार केला जावा.

३. गुजरात, मुज्जफरनगरसारख्या भागांमध्ये दंगलपिडीत मुस्लिम महिलांना आणि समाजाला न्याय मिळावा, यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जावी.

४. मुस्लिम समाजाचा शिक्षण आणि रोजगारात, तसेच मुख्य प्रवाहात समावेश होण्यासाठी सच्चर आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारसी लागू कराव्यात.

५. नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ हे शेजारच्या देशांतून स्थलांतरित हिंदूंना समाविष्ट करते. पण, त्या नावाने देशातील मुस्लिम नागरिकांमध्ये भय निर्माण करते आहे. स्थलांतराचा प्रश्न वापरुन मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणारे आणि हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करणारे हे विधेयक मागे घेतले जावे.

६.मुस्लिम महिलांच्या मुख्य मागण्या या शिक्षण, सुरक्षितता, रोजगार आणि कायदे ह्या आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांनी या मागण्यांचा विचार करुन पाठिंबा दयावा आणि दीर्घकालीन धोरण तयार करावे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीमMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चाVotingमतदान