शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वामी विवेकानंदांवर संगीतमय चरित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:05 IST

‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची उभारणी होणार

पुणे : ‘माझ्या बंधू-भगिनींनो...’ या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत दिलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्रातर्फे ‘युगनायक विवेकानंद’ हा संगीतमय चरित्रपट तयार करण्यात आला आहे. पुण्यात ‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची निर्मिती करण्यात येत आहे. त्याच्या उभारणीसाठी चरित्रपटाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग पुण्यात होणार आहेत.रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांनी ही माहिती दिली. या चरित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केदार पंडित, प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर, नृत्यदिग्दर्शिका अमीरा पाटणकर, मधुरा आफळे आणि कार्यकारी दिग्दर्शक नचिकेत जोग या वेळी उपस्थित होते. या चरित्रपटाचे कथालेखक आणि गीतकार स्वामी श्रीकांतानंदजी हे आहेत. पुण्यातील प्रयोगांनंतर या चरित्रपटाचे प्रयोग राज्यातील प्रमुख शहरांत सादर केले जाणार आहेत.स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, ‘‘रामकृष्ण मठाच्या परिसरात ‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची उभारणी करण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या चार वर्षांत हे ज्ञानपीठ उभे राहील. त्यात भाषा, संस्कृती आणि मूल्यशिक्षण याविषयीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्कृती आणि मूल्य शिक्षण देणारे ‘विवेकानंद स्कूल आॅफ कल्चर’, विविध परकीय भाषांचे ज्ञान देणारी ‘निवेदिता स्कूल आॅफ लँग्वेजेस्’, एम.ए. अभ्यासक्रम व आॅनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा असलेले ‘वेद संस्कृती विद्यालय’ यांचा समावेश आहे. चरित्रपटाच्या प्रयोगातून मिळणारा निधी मठातील विविध कार्यांसाठी खर्च केला जाईल.’’पोवाडा, भजन, शास्त्रीय संगीताचा समावेशजाणता राजा’च्या धर्तीवर ‘युवानायक विवेकानंद’ या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपांची १७ गीते आहेत. पं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्यावरील महानाट्याचे स्वप्न साकार झाले आहे.- केदार पंडितया चरित्रपटाचे महानायक स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाज वापरला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मनात उमटलेली, स्वामी श्रीकांतानंदजी यांनी गीताच्या रूपात मांडलेली आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली भावना माझ्या आवाजातून व्यक्त होते. - संजीव अभ्यंकर

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदcinemaसिनेमा