शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मित्राचा खून झाला उघड, मृतदेहाचे तुकडे जाळून टाकले कालव्यात, गुन्हे विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:02 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून १० महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून १० महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.विक्रम शेखर पिल्ले (वय २८, रा. फातिमानगर), राजू शिवाप्पा नारायण नाईक (वय ३४), संभू बाळकृष्ण थापा (वय २० दोघेही रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी), फारूक रफिक शेख (वय २६) आणि शाहरुख सिकंदर शेख (वय २५, दोघेही रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिल्ले विरोधात पाच गुन्हे दाखल असून तो खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. न्यायालयाने त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बी. टी. कवडे रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही युवक कॅनॉल रोड येथे येणार असल्याची माहिती युनिट एकमधील पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २८) रात्री ११ च्या सुमारास पथकाने सापळा लावून पिल्लेसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एअर गन, काडतुसे, चार कोयते, मास्क, दोरी व मोबाईल, असा १८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी त्यांचा मित्र विकी रमेश पोताण (वय २५ रा. ढोबळवाडी, वानवडी) याचा खून केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, समीर शेख, नितीन भोसले पाटील, धनंजय कापरे, हर्षल कदम, प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, राजाराम सुर्वे यांनी कारवाई केली़जॉकी.. ते गुन्हेगारआरोपी विक्रम पिल्ले हा हॉर्स रायडर (जॉकी) म्हणून पेसी शॉप आणि मल्लेश नरेडू या कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याला दीड लाख रुपये वेतन होते. हॉर्स रायडिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने इंग्लंड आणि मलेशिया या देशांमध्ये काही वर्षे वास्तव्य केले आहे. मात्र, वाईट वर्तनामुळे त्याला कंपनीतून काढूले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्याने वानवडी परिसरात चायनिज हॉटेल टाकले होते. केवळ सहावीपर्यंत शिक्षण घेतलेला पिल्ले सफाईदारपणे इंग्रजीत संभाषण करतो.मृतदेहाच्या तुकड्यांची कालव्यात विल्हेवाटआरोपी विक्रम पिल्ले याने चायनिज पदार्थांचे हॉटेल सुरू केले होते. विकी पोताण हा हॉटेलमध्ये येऊन त्यास दमदाटी करीत पैसे घेत होता. तसेच, फुकटात जेवण करीत असे. विकीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पिल्ले आणि इतर चौघांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला.जानेवारी महिन्यात त्याला हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. त्यानंतर त्याला दारू पाजली. नशेत असताना त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला. तसेच, मृतदेहाचे तुकडे करून ते अर्धवट जाळले आणि वानवडी परिसरातील कालव्यात फेकून दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा