शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा वार्‍यावर

By admin | Updated: June 9, 2014 23:37 IST

आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे.

पुणे : दोन वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे. ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाने घ्यावी यासाठी भवन विभागाने दलास पत्र पाठविले आहे. तर अग्निशमनदलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच संपूर्ण शहराची जबाबदारीही दलाकडेच असल्याने भवन विभागानेच ते काम पहावे अशी भूमिका अग्निशमनदलाच्या अधिका-यांनी घेतली आहे. मागील आठवडयातच या यंत्रणेची अंतिम चाचणी झाली असून ही यंत्रणा वापरासाठी सज्ज आहे.मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेऩंतर सर्व शासकीय कार्यालयांनी अग्निशमन यंत्रणा तत्काळ उभारण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार, तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिका प्रशासनाने मुख्यभवनात अग्निशमन यंत्रणा उभारलेली आहे. त्याची अंतिम चाचणीही नुकतीच पार पडली असून ही यंत्रणा वापरण्यासाठी तयार आहे. मात्र, ही यंत्रणा वापरासाठी अद्याप कोणतेही मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती भिंतीवर शोभेपुरतीच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही यंत्रणा भवन विभागाने उभारलेली आहे. त्यामुळे तीच्या देखभालाची जबाबदारीही भवन विभागाची आहे, तर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असणा-या कर्मचा-यांना ती वापरण्याची माहिती आहे. त्यामुळे भवन विभागाने ही यंत्रणा या पुढे अग्निशमन विभागाने सांभाळावी असे पत्र दलास दिले आहे. मात्र, दलाकडून त्यास नकार दिला आहे. अग्निशमनदलावर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. तसेच आधीच दलाची यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे ही जबाबदारी भवन विभागानेच स्विकारावी अशी भूमिका अग्निशमनदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतली आहे. परिणामी ही वापरासाठी सज्ज असलेली यंत्रणा रामभरोसेच महापालिकेत उभी असून एखादी दूर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ही यंत्रणा उभारण्याआधी तीची अंमलबजावणी कोण करणार याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही. शासनाचा आदेश म्हणून गडबडीने ही यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. ही यंत्रणा वापरण्यासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांना प्रशिक्षणही देण्यात येणार होते. मात्र, अद्यापही हे प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कोणतीही दूर्घटना घडल्यास काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.