शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

मुलुंडला नाट्य संमेलन : पुण्यातून दहा जणांचीच नावनोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:52 AM

ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे.

पुणे - ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे. संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना नाट्य परिषदेच्या पुणे शाखेकडे केवळ १० जणांचीच नावनोंदणी झाली आहे, तर कोथरूड शाखेकडे नोंदणीच झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संमेलनामध्ये सहभागी होणे हे केवळ मुंबईमधील रंगकर्मी आणि रसिकांनाच शक्य आहे. पावसाच्या दिवसामध्ये रेल्वेलाईन ठप्प होण्यापर्यंत परिस्थिती उद्भवते. या सर्वांचा विचार करून संमेलनाला न जाण्याचा विचारच अनेकांनी बोलून दाखविला आहे. मुळात संमेलनस्थळापासून आमची सोय लांबच्या लॉज किंवा हॉटेलवर केली असेल तर आम्ही जायचे कसे, असा प्रश्न पुण्यातील काही ज्येष्ठ रंगकर्मींनी उपस्थित केला आहे.येत्या चार दिवसांवर (१३ ते १५ जून) मुलुंडचे नाट्य संमेलन आले आहे. मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या कारकिर्दीतील हे पहिलेच नाट्य संमेलन असल्याने पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यंदा वेगळेपण दाखवायचे म्हणून ६० तास संमेलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्यात हे संमेलन होत आहे. मुंबईचा २६ जुलैचा पाऊस अनेकांच्या स्मरणात असल्याने इच्छा असूनही पुण्यातील रंगकर्मी आणि रसिकांनी पावसाच्या काळात संमेलनाला न जाणेच पसंत केले आहे. यातच रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंगच बंद केले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई गाडीने जाण्याशिवाय पर्याय नाही; मात्र हायवेवर दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्याने जाणार तरी कसे,असे काही रंगकर्मींकडून सांगण्यात आले.मागच्या वर्षीही उन्हाळ्याच्या कडक हंगामात उस्मानाबादला नाट्य संमेलन घेण्यात आले, संमेलन हे किमान वेळ आणि काळ पाहून घेतले जायला हवे तर जास्तीत जास्त लोक संमेलनाचा आस्वाद घेऊ शकतील. तर संमेलनात पुण्यातील रंगकर्मी दुर्लक्षित राहातात. काही मोजकेच व्यक्ती आणि राजकाराण्यांना त्याचा फायदा होतो. हे संमेलन आमच्यासाठी आहे असे वाटतच नाही, अशी खंत काहींनी व्यक्त केली.पुण्यातील लोक संमेलनाला जात नाहीतमुलुंडच्या नाट्य संमेलनासाठी पुण्यातून १० जणांची नावनोंदणी झाली आहे. व्हॉटसअपच्या माध्यमातून परिषदेच्या सदस्यांना निमंत्रण पत्रिका पोहोचलेली आहे. मात्र, पुण्यातील लोक संमेलनाला जात नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. त्याची कारणं माहीत नाहीत.- दीपक रेगे, प्रमुख कार्यवाह, नाट्यपरिषद पुणे शाखा

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या