शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया याेजना प्रभावी : मिलिंद कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:55 IST

मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'भारतीय उद्योग विश्वातील सद्यस्थिती' या विषयावर वार्तालापाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. 

कांबळे म्हणाले, न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या याेजना चांगल्या आहेत. युपीए सरकारने त्यांच्या याेजना लाेकांपर्यंत पाेहचविल्या नाहीत. माेदी सरकारच्या काळात सरकारी याेजना नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात आल्या. माेदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले हाेते. अर्थव्यवस्थेबाबत बाेलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्विकारली तेव्हा या साेबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमाेर निर्माण झाली. काळापैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकाेनामी ही त्यापैकी काही आव्हाने हाेती. त्यामुळे स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी नाेटाबंदी करण्यात आली. तसेच जीएसटी देखील लागू करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था डिजीटल करण्यासाठी हे बदल करण्यात आले. 

सध्या महागाई ही नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे जे म्हंटले जाते यात तथ्य नसल्याचे मला वाटते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगातील सहावी सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहे. शेती व्यवसायाबाबात बाेलताना कांबळे म्हणाले, राज्याचे बजेट हे शेतीला डाेळ्यासमाेर ठेवून केले जाते. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. खासगी क्षेत्राने देखील शेतीत गुंतवणूक करायला हवी. सामूहिक शेतीची सध्या गरज आहे. शेती हा उद्याेग समजून केल्यास यश मिळू शकते. 

याबराेबरच भारतीय सफरचंदाची जागतिक स्तरावर ब्रॅंण्डिंग करणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्था