शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया याेजना प्रभावी : मिलिंद कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:55 IST

मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'भारतीय उद्योग विश्वातील सद्यस्थिती' या विषयावर वार्तालापाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. 

कांबळे म्हणाले, न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या याेजना चांगल्या आहेत. युपीए सरकारने त्यांच्या याेजना लाेकांपर्यंत पाेहचविल्या नाहीत. माेदी सरकारच्या काळात सरकारी याेजना नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात आल्या. माेदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले हाेते. अर्थव्यवस्थेबाबत बाेलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्विकारली तेव्हा या साेबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमाेर निर्माण झाली. काळापैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकाेनामी ही त्यापैकी काही आव्हाने हाेती. त्यामुळे स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी नाेटाबंदी करण्यात आली. तसेच जीएसटी देखील लागू करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था डिजीटल करण्यासाठी हे बदल करण्यात आले. 

सध्या महागाई ही नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे जे म्हंटले जाते यात तथ्य नसल्याचे मला वाटते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगातील सहावी सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहे. शेती व्यवसायाबाबात बाेलताना कांबळे म्हणाले, राज्याचे बजेट हे शेतीला डाेळ्यासमाेर ठेवून केले जाते. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. खासगी क्षेत्राने देखील शेतीत गुंतवणूक करायला हवी. सामूहिक शेतीची सध्या गरज आहे. शेती हा उद्याेग समजून केल्यास यश मिळू शकते. 

याबराेबरच भारतीय सफरचंदाची जागतिक स्तरावर ब्रॅंण्डिंग करणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्था