शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 14:00 IST

एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते?...

पुणे : दरवर्षी यूपीएससी अथवा एमपीएससीची तयारी करणाऱ्यांची संख्या काही लाखांत असते. मात्र, यातून केवळ ५०० ते १०००च्या आसपास पदभरती होते. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्यक्ष यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या पाहता. प्रचंड मोठी दरी पाहायला मिळते. मग जे विद्यार्थी यशस्वी होत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे राहतात. वारंवार अपयश येत असलेल्या विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान ठेवून करिअरच्या आयुष्याची घडी सुरळीत बसवण्यासाठी दुसरा पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते?

राज्यभरातून १० ते १२ लाख विद्यार्थी विविध एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांचा यामध्ये समावेश असतो. खासगीपेक्षा सरकारी नोकरी कधी चांगली असते. तसेच समाजात मानसन्मान असणारी नोकरी म्हणूनदेखील पाहिलं जाते. सरकारी नोकरी ही सुरक्षित असल्याने त्याकडे तरुणांचा कल जास्त असतो.

सरकारी नोकरी मिळावी म्हणून राज्यभरतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रयत्न करताना दिसतात. परिणामी या क्षेत्रात जास्त गर्दी झालेली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी, वर्षाचा खर्च एक लाख

पुण्यात अभ्यासाची तयारी करताना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपयांपर्यंत खर्च येताे. दोन वेळचे जेवण, खोली भाडे (रूम) अभ्यासिका आदींचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षाला जवळपास दीड लाख रुपये प्रतिविद्यार्थी खर्च येत आहे, तर पुण्याऐवजी दिल्लीमध्ये प्रतिविद्यार्थी प्रतिमहिना दुप्पट म्हणजे १५ ते २० हजार रुपयांचा खर्च येत आहे.

दोन टक्के यशस्वी होतात, ९८ टक्क्यांचे काय?

सरकारी कार्यालयात १ ते २ टक्के रिक्त जागा असतात. मात्र, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता खूप मोठी तफावत पाहायला मिळते. परीक्षांचा निकालही केवळ १ ते २ टक्के लागतो. राज्यातील अनेक विभागांत जागा रिक्त आहेत. मात्र, सरकारची नोकरभरती करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे नोकरीभरतीला अडचण येत आहेत. बेरोजगारीचा आलेख वाढत आहे. अनेक जागा रिक्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे इतरांवर कामाचा ताण येत आहे, अशी अनेक कारणे आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.

दुसरा पर्याय असायलाच हवा

स्पर्धा परीक्षेची सुरुवात करतानाच प्लॅन ‘बी’ हा प्रत्येक विद्यार्थ्यांने ठरवायला हवा; कारण ६ ते ८ वर्षे तयारी करूनही सरकारी नोकरी लागलीच नाही तर काय, असा प्रश्न प्लॅन ‘बी’ असल्यास पडत नाही. परंतु, ६ ते ८ वर्षांचा गॅप आणि व्यावसायिक शिक्षण यांमुळे खासगी नोकरी मिळवताना अडचणी उभ्या राहतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अनेक क्षेत्रांत हे विद्यार्थी चमकू शकतात. यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन पर्याय मार्ग शोधून ठेवणे आवश्यक आहे.

- सचिन हिसवणकर, शिक्षणतज्ज्ञ

वारंवार अपयशाने खचू नका

पद मिळवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी या क्षेत्राकडे वळतात. प्रेरणा घेण्यात काहीही गैर काही नाही. मात्र, त्यात खोटा आत्मविश्वास नको. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतानाच आपल्या क्षमता तपासूनच निर्णय घ्यावा. आपली ताकद काय, नकारात्मक बाजू कोणत्या या ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. या स्पर्धेत प्रत्येक जण यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता दुसरा पर्याय निवडल्यास तेथे आर्थिक फायद्याबरोबर मानसिक समाधानही मिळेल.

- शिरीष शितोळे, मानसोपचार तज्ज्ञ

वय ओलांडू लागले, पुढे काय?

स्पर्धा परीक्षेची तयारी सहा वर्षांपासून करत आहे. या सहा वर्षांत केवळ दोन परीक्षा मला देता आल्या आहेत. कारण एकच परीक्षेची प्रक्रिया तीन-तीन वर्षे सुरू असते. त्यामुळे संधी कमी होतात आणि यशाचा भरवसादेखील मिळत नाही. वय वाढत असल्याने घरून तसेच नातेवाइकांकडून सतत विचारणा होते. हातात काही नसल्याने नैराश्य येते. पुढे काय, असे प्रश्न निर्माण होतात. मात्र, सरकारच्या अनास्थेमुळे काहीही मार्ग निघत नाही.

- शिवाजी, विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग