शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

"शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही..."; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:26 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

Supriya Sule on Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी बोलताना धक्कादायक विधान केलं होतं. हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असं विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी कृषीमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटलं नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं.  कृषी विभागाच्या प्रदर्शनादरम्यान बोलताना मंत्री कोकाटे यांनी हे विधान केलं. हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.

यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. "मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. कारण अनेकदा त्यांनी अनेक अशी विधानं केली आहेत. त्यांनीच म्हटलं की पीक विम्यामध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. जर पाच हजार कोटींचा विमा घोटाळा झाला आहे तर त्यांनी त्यासंदर्भात काय कारवाई केली? तेच म्हणतात की केंद्र सरकारकडून निधी येत नाही. हे माझं विधान नाही तर राज्याच्या कृषीमंत्र्यांचे विधान आहे. आपल्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही दुःखाची गोष्ट आहे. हे सरकार महाराष्ट्रातच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे हे यातून दिसून येतं," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कृषिमंत्र्यांची सारवासारव

दरम्यान, शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर रोष निर्माण झाल्याने माणिकराव कोकाटे यांनी सारवासारव केली. “विरोधक माझ्या त्या वक्तव्यावर टीका करणारच कारण त्यांना तेवढी संधी पाहिजे. मी केलेलं वक्तव्य त्यांना तरी कळलं का?. मी म्हटलं की, एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले. त्यामुळे एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. पण माध्यामांनी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं आणि लोकांनी चुकीचा अर्थ काढला," असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAjit Pawarअजित पवार