शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

"शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही..."; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:26 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

Supriya Sule on Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी बोलताना धक्कादायक विधान केलं होतं. हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असं विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी कृषीमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटलं नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं.  कृषी विभागाच्या प्रदर्शनादरम्यान बोलताना मंत्री कोकाटे यांनी हे विधान केलं. हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.

यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. "मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. कारण अनेकदा त्यांनी अनेक अशी विधानं केली आहेत. त्यांनीच म्हटलं की पीक विम्यामध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. जर पाच हजार कोटींचा विमा घोटाळा झाला आहे तर त्यांनी त्यासंदर्भात काय कारवाई केली? तेच म्हणतात की केंद्र सरकारकडून निधी येत नाही. हे माझं विधान नाही तर राज्याच्या कृषीमंत्र्यांचे विधान आहे. आपल्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही दुःखाची गोष्ट आहे. हे सरकार महाराष्ट्रातच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे हे यातून दिसून येतं," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कृषिमंत्र्यांची सारवासारव

दरम्यान, शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर रोष निर्माण झाल्याने माणिकराव कोकाटे यांनी सारवासारव केली. “विरोधक माझ्या त्या वक्तव्यावर टीका करणारच कारण त्यांना तेवढी संधी पाहिजे. मी केलेलं वक्तव्य त्यांना तरी कळलं का?. मी म्हटलं की, एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले. त्यामुळे एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. पण माध्यामांनी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं आणि लोकांनी चुकीचा अर्थ काढला," असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAjit Pawarअजित पवार