शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्करसाठी चळवळ... सकारात्मक वातावरणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:53 IST

दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात!

- नम्रता फडणीसपुणे - दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात! मात्र, या वर्षभराच्या कालावधीत आपले भारतीय चित्रपट आॅस्कर अकादमीपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणत्याच हालचाली घडताना दिसत नाहीत. यासाठीच भारतीय चित्रपटांबद्दल एक सकारात्मक वातावरण निर्माण होण्याकरिता अमेरिकेतील आॅस्कर अकादमीच्या अंतर्गत उपक्रमांमध्ये भारतीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.आॅस्कर अकादमीचे सदस्य आणि ‘एसएमपीटीई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय विभागाचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांची आॅस्कर अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच अमेरिकेतील लॉस एंजिलिसमधल्या आॅस्कर अकादमीला नुकतीच भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी आॅस्कर अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्याशी तब्बल दीड तास संवाद साधून आॅस्कर व भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, याविषयी चर्चा केली. त्याविषयी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. उज्ज्वल निरगुडकर म्हणाले, ‘‘भारतीय चित्रपटाचा विदेशी विभागात आॅस्कर अ‍ॅवॉर्डमध्ये समावेश केला जातो. भारतात वर्षाला १,२०० चित्रपट बनविले जातात. त्यातील एकाच चित्रपटाची एंट्री पाठविली जाते. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील ९० देशांतले चित्रपट आॅस्कर अकादमीकडे येतात; मग त्यातील एक चित्रपट निवडला जातो.’’खास ज्युरींसाठी महोत्सव1 भारताला अधिक चित्रपटांची एंट्री करायला मिळायला हवी; मात्र ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे डॉन हडसन यांना भारतातल्या १० चित्रपटांचा महोत्सव भरवला जाऊ शकतो का? अशी सूचना केली. तो महोत्सव केवळ आॅस्कर ज्युरी सदस्यांसाठी असेल. त्यात राष्ट्रीय पुरस्कारविजेते किंवा क्लासिकल चित्रपट असतील.2आपणच दर वर्षी देशातून चित्रपट निवडून त्यांना चित्रपट दाखविण्याचा कार्यक्रम झाला, तर त्यांची भारतीय चित्रपटांबद्दलची मते किंवा मानसिकता बदलू शकते. आपल्याला विदेशी विभागात जेव्हा मतदान होते, तेव्हा सकारात्मक मत तयार होईल. आपल्याला मतदान होत नसेल, कारण कदाचित संपूर्ण चित्रपट हा पाहिला जात नसेल. हे कुणी सांगणार नाही. किमान आपल्याला प्रबोधन करता येणे शक्य आहे. डायरेक्टर आॅफ फिल्म फेस्टिव्हल यांच्यामार्फत तो करता येऊ शकतो. कान्स महोत्सवाला आपण आपले चित्रपट पाठवितो. असा एक उपक्रम चालविला जाऊ शकतो.3दर आठवड्याला आॅस्कर अ‍ॅकॅडमीचे विविध कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस मिळू शकतात. या सूचनेला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.९० देशातले चित्रपट आॅस्कर अकादमीकडे येतात; मग त्यातील एक चित्रपट निवडला जातो.१२०० चित्रपट भारतात वर्षालातयारहोतातआपल्या देशातली स्पर्धा अमेरिकेपेक्षा अधिक खडतर आहे. आपल्याकडून १,२०० मधून एक चित्रपट, तर तिकडे ९० मधून एक निवडतात. 

टॅग्स :Oscarऑस्करcinemaसिनेमा