शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:55 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीचा पुण्यात नारा : आंदोलन करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी

पुणे : ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ अशा घोषणा देत ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे, नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले आहेत, असा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.कर्नाटकच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले आहे, असा आरोप करून वंदना चव्हाण म्हणाल्या, ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले होते. जेवढे मतदान झाले तेवढीच मते मशिनमध्ये मोजली गेली पाहिजेत. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत घोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे दिसून येते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेले प्रत्येक नागरिकाचे मत हे मोजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास बसेल. त्यामुळे यापुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची नागरिकांना शंका आहे. सर्वप्रथम भाजपाचे किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. तसेच ईव्हीएमचा शोध लावणाऱ्या देशातही आता ईव्हीएमद्वारे आता मतदान घेतले जात नाही. तसेच जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. परिणामी ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे वारंवार समोर आल्याने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचा खूनकाँग्रेस व जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची एकूण ११५ आमदार व दोन अपक्ष, असे दोन्ही पक्षांचे मिळून एकूण ११७ आमदार होत असताना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केले. त्यांनी संसदीय लोकशाहीचा खून केला. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने देशात लोकशाहीचा काळा दिवस म्हणून धरणे आंदोलन केले. शहर काँग्रेसच्या वतीने बेलबाग चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, गटनेते अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक