शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘त्या’ जनावरांचे स्थलांतर करा

By admin | Updated: June 23, 2016 02:20 IST

मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला

राजेगाव : मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. दरम्यान, या जनावरांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दौंड न्यायालयात शासनाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांत २९ जनावरे दगावल्याची नोंद पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालयाकडे जरी असली तरी यापूर्वी शेकडो जनावरे चारा आणि पाण्यावाचून दगावली असल्याची वस्तुस्थिती आहे. ‘लोकमत’ने बुधवारी मलठण केंद्रातील जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडून मरत असल्याचे वास्तव समोर आणले होते. तहसीलदार उत्तम दिघे, बारामती विभागाचे सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नराळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, मंडल अधिकारी मोहन कांबळे, गावकामगार तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे आणि त्यांचे पथक दिवसभर या ठिकाणी तळ ठोकून होते.सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी गाई-म्हशींचे पालनपोषण करण्यासाठी कोणतेही प्रशासन उपलब्ध नसल्याने कोर्टाने तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना आदेश दिला आहे की, ताबडतोब सदर जनावरे पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतरित करण्यात यावीत. शासकीय पातळीवर चारा उपलब्ध केला आहे.पेंढी आणण्याची तसदी घेतली नाहीमलठण येथील जनावरांच्या सुरक्षिततेचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाय, येथे दिवसभर स्थानिक ग्रामस्थ व दूरवरून येणाऱ्यांची गर्दी वाढली. काही जण तर सेल्फी काढून फोटो लोड करत होते; पण मदत म्हणून एखादी पेंढी चारा आणायचे धाडस कोणीही केले नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.दोन दिवसांत २९ जनावरे दगावली तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, मंगळवारी २१, तर बुधवारी ८ जनावरे दगावली. तसेच, येथे ३0१ जनावरे शिल्लक आहेत. न्यायालयाने सदर जनावरे स्थलांतरित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. उद्या सकाळी भोसरी येथील पांजरपोळात संकरित गाई स्थलांतरित करण्यात येतील. एक-दोन दिवसांत म्हशी स्थलांतरित करण्यात येतील.जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवरगेल्या काही दिवसांत सुमारे ३00 ते ४00 जनावरे दगावली आहेत; परंतु येथील कामगारांनी या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे परिसरात बोलले जात होते. शासनाकडे २९ जनावरे दगावल्याची नोंद असली, तरी वस्तुस्थितीत जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवर आहे.