शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जनावरांचे स्थलांतर करा

By admin | Updated: June 23, 2016 02:20 IST

मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला

राजेगाव : मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. दरम्यान, या जनावरांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दौंड न्यायालयात शासनाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांत २९ जनावरे दगावल्याची नोंद पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालयाकडे जरी असली तरी यापूर्वी शेकडो जनावरे चारा आणि पाण्यावाचून दगावली असल्याची वस्तुस्थिती आहे. ‘लोकमत’ने बुधवारी मलठण केंद्रातील जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडून मरत असल्याचे वास्तव समोर आणले होते. तहसीलदार उत्तम दिघे, बारामती विभागाचे सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नराळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, मंडल अधिकारी मोहन कांबळे, गावकामगार तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे आणि त्यांचे पथक दिवसभर या ठिकाणी तळ ठोकून होते.सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी गाई-म्हशींचे पालनपोषण करण्यासाठी कोणतेही प्रशासन उपलब्ध नसल्याने कोर्टाने तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना आदेश दिला आहे की, ताबडतोब सदर जनावरे पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतरित करण्यात यावीत. शासकीय पातळीवर चारा उपलब्ध केला आहे.पेंढी आणण्याची तसदी घेतली नाहीमलठण येथील जनावरांच्या सुरक्षिततेचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाय, येथे दिवसभर स्थानिक ग्रामस्थ व दूरवरून येणाऱ्यांची गर्दी वाढली. काही जण तर सेल्फी काढून फोटो लोड करत होते; पण मदत म्हणून एखादी पेंढी चारा आणायचे धाडस कोणीही केले नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.दोन दिवसांत २९ जनावरे दगावली तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, मंगळवारी २१, तर बुधवारी ८ जनावरे दगावली. तसेच, येथे ३0१ जनावरे शिल्लक आहेत. न्यायालयाने सदर जनावरे स्थलांतरित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. उद्या सकाळी भोसरी येथील पांजरपोळात संकरित गाई स्थलांतरित करण्यात येतील. एक-दोन दिवसांत म्हशी स्थलांतरित करण्यात येतील.जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवरगेल्या काही दिवसांत सुमारे ३00 ते ४00 जनावरे दगावली आहेत; परंतु येथील कामगारांनी या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे परिसरात बोलले जात होते. शासनाकडे २९ जनावरे दगावल्याची नोंद असली, तरी वस्तुस्थितीत जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवर आहे.