शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"सत्ताधाऱ्यांच्याच काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:20 IST

केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात.

नारायणगाव : केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात. ज्या रयतेने कल्याणकारी राज्य म्हणून निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडवर नव्हे तर कुठल्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा आणून त्या पैशातून दहशतवाद्यांविरोधत कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळाव्याचे आयोजन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, युवा नेते अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, अशोक घोलप, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे, निवृत्ती काळे, देवदत्त निकम, राजश्री बोरकर उपस्थित होते.डॉ. कोल्हे म्हणाले, पुलवामा हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी? शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकले नाहीत.अजित पवार म्हणाले की, पुरंदरला विमानतळ नेण्याचे पाप कुणाचे आहे. बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत. खेड ते सिन्नर या रस्त्याचे १३८ कि.मी.पैकी १०९ कि.मी.चे काम झाले आहे. २९ कि.मी.चे काम अपुरे राहिले यास जबाबदार कोण आहे? रेल्वे येणार हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सांगतात. आता तर हायस्पीड रेल्वे येणार, अशी घोषणा करणाऱ्यांनी पहिली रेल्वे तर सुरू करून दाखवावी. यावेळी दिलीप वळसेपाटील, विलास लांडे, अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. हिरापंकज पिंपळगावकर यांनी केले.>सिनेअभिनेते, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत असल्याने मंगळवारी नारायणगाव येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. परंतु, अजित पवार यांनी उमेदवारीबाबत बगल देत जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल, असे भाषणात दोन-तीन वेळा उल्लेख केल्याने डॉ. कोल्हे यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना डॉ. कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे सांगितल्याने नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला याबाबत उलट सुलट चर्चा सभा सुटल्यानंतर सुरू होती. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर होणार, असे समजून आलेले त्यांचे चाहते उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त करत निघून गेले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९