शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"सत्ताधाऱ्यांच्याच काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:20 IST

केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात.

नारायणगाव : केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात. ज्या रयतेने कल्याणकारी राज्य म्हणून निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडवर नव्हे तर कुठल्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा आणून त्या पैशातून दहशतवाद्यांविरोधत कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळाव्याचे आयोजन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, युवा नेते अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, अशोक घोलप, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे, निवृत्ती काळे, देवदत्त निकम, राजश्री बोरकर उपस्थित होते.डॉ. कोल्हे म्हणाले, पुलवामा हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी? शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकले नाहीत.अजित पवार म्हणाले की, पुरंदरला विमानतळ नेण्याचे पाप कुणाचे आहे. बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत. खेड ते सिन्नर या रस्त्याचे १३८ कि.मी.पैकी १०९ कि.मी.चे काम झाले आहे. २९ कि.मी.चे काम अपुरे राहिले यास जबाबदार कोण आहे? रेल्वे येणार हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सांगतात. आता तर हायस्पीड रेल्वे येणार, अशी घोषणा करणाऱ्यांनी पहिली रेल्वे तर सुरू करून दाखवावी. यावेळी दिलीप वळसेपाटील, विलास लांडे, अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. हिरापंकज पिंपळगावकर यांनी केले.>सिनेअभिनेते, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत असल्याने मंगळवारी नारायणगाव येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. परंतु, अजित पवार यांनी उमेदवारीबाबत बगल देत जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल, असे भाषणात दोन-तीन वेळा उल्लेख केल्याने डॉ. कोल्हे यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना डॉ. कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे सांगितल्याने नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला याबाबत उलट सुलट चर्चा सभा सुटल्यानंतर सुरू होती. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर होणार, असे समजून आलेले त्यांचे चाहते उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त करत निघून गेले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९