शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षांतील एप्रिलमधील सर्वांत तप्त दिवस : डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 19:06 IST

हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़.

पुणे : हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़. त्यामुळेच २६ एप्रिलचा दिवस हा पुण्यातील गेल्या शंभर वर्षातील एप्रिलमधील सर्वात तप्त दिवस ठरला असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .

पुणे शहरात ३० एप्रिल १८९७ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ४३़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते़. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ४२़६ अंश सेल्सिअस गेले होते़. याविषयी बोलताना डॉ़ जीवनप्रकाश कुलकणी  यांनी सांगितले की, गेल्या शंभर वर्षातील कमाल तापमान पाहिल्यावर दर ३० वर्षांची असे सायकल येत असते़. १९८० नंतर तापमान वाढत चालले आहे़ त्याअगोदर ४०च्या जवळपास कमाल तापमान असे़ त्यात एखाद्या डिग्री कमी जास्त होत असे़. आता कमाल तापमान वाढण्यामध्ये अनेक कारणे आहेत़. 

मार्चमध्ये सूर्य विषववृत्त ओलांडून उत्तरेकडे येऊ लागला की मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये तापमान वाढत जाते़. मध्य भारत, उत्तर भारत हा मोठा भूभागाचा प्रदेश आहे़ तर दक्षिणेकडे तो निमुळता होत जातो़. त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र असल्याने त्या ठिकाणचे तापमाना जास्त वाढू शकत नाही़. 

त्याचवेळी हिंदी महासागरात विषववृत्ताच्या दक्षिणेला एक चक्रीवादळ तयार झाले आहे़. त्यामुळे तेथील हवा वर वर जात आहे़ ही हवा मध्य भारत, उत्तर भारतात खाली येताना पुन्हा गरम होत आहे़. तसेच विषववृत्ताच्या उत्तरेला आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे़. आणि श्रीलंकेच्या जवळपासही चक्रीवादळ तयार झाले आहे़. ही हवा वर वर जात असल्याने पुढील काही दिवसात तामिळनाडुमध्ये पावसाची शक्यता आहे़ मात्र, त्याचवेळी उत्तर भारतात खाली उतरणाºया गरम हवेमुळे उत्तर, मध्य भारत तापला आहे़. याचा परिणाम पुण्यासह सर्वत्र कमाल तापमानाचा उच्चांक गाठला जात आहे़ याबरोबरच हवेचे चलनवलन कसे आहे, यावर तापमान ठरते़ .

याचे उदाहरण द्यायचे झाले तर बंद खोलीतील हवामान आणि उघड्या खोलीतील तापमानात जसा फरक पडतो तसेच जर गरम हवा साचू राहिली तर तेथील तापमानात मोठी वाढ होऊ शकते़. तापमान वाढीत हा व्हेटिलेशन इंडेक्सही महत्वाचा ठरतो़. या कारणांमुळे पुण्यात शंभर वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. १८९७ मध्येहीही अशीच परिस्थिती निर्माण झाली असेल़ त्याच्या अगोदरच्या वर्षी दुष्काळी स्थिती असण्याची शक्यता असल्याने जमिनीतील ओलावा जवळजवळ नसल्यासारखा असू शकतो़. त्यामुळे तेव्हा ४३़३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले असेल़ विषववृत्तावर निर्माण झालेली चक्रीवादळाची स्थिती अजून २ दिवस तरी राहणार आहे़. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमान असेच वाढते राहण्याची शक्यता आहे, असे डॉ़ जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .

टॅग्स :Temperatureतापमान