शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शंभर वर्षांतील एप्रिलमधील सर्वांत तप्त दिवस : डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 19:06 IST

हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़.

पुणे : हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़. त्यामुळेच २६ एप्रिलचा दिवस हा पुण्यातील गेल्या शंभर वर्षातील एप्रिलमधील सर्वात तप्त दिवस ठरला असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .

पुणे शहरात ३० एप्रिल १८९७ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ४३़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते़. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ४२़६ अंश सेल्सिअस गेले होते़. याविषयी बोलताना डॉ़ जीवनप्रकाश कुलकणी  यांनी सांगितले की, गेल्या शंभर वर्षातील कमाल तापमान पाहिल्यावर दर ३० वर्षांची असे सायकल येत असते़. १९८० नंतर तापमान वाढत चालले आहे़ त्याअगोदर ४०च्या जवळपास कमाल तापमान असे़ त्यात एखाद्या डिग्री कमी जास्त होत असे़. आता कमाल तापमान वाढण्यामध्ये अनेक कारणे आहेत़. 

मार्चमध्ये सूर्य विषववृत्त ओलांडून उत्तरेकडे येऊ लागला की मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये तापमान वाढत जाते़. मध्य भारत, उत्तर भारत हा मोठा भूभागाचा प्रदेश आहे़ तर दक्षिणेकडे तो निमुळता होत जातो़. त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र असल्याने त्या ठिकाणचे तापमाना जास्त वाढू शकत नाही़. 

त्याचवेळी हिंदी महासागरात विषववृत्ताच्या दक्षिणेला एक चक्रीवादळ तयार झाले आहे़. त्यामुळे तेथील हवा वर वर जात आहे़ ही हवा मध्य भारत, उत्तर भारतात खाली येताना पुन्हा गरम होत आहे़. तसेच विषववृत्ताच्या उत्तरेला आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे़. आणि श्रीलंकेच्या जवळपासही चक्रीवादळ तयार झाले आहे़. ही हवा वर वर जात असल्याने पुढील काही दिवसात तामिळनाडुमध्ये पावसाची शक्यता आहे़ मात्र, त्याचवेळी उत्तर भारतात खाली उतरणाºया गरम हवेमुळे उत्तर, मध्य भारत तापला आहे़. याचा परिणाम पुण्यासह सर्वत्र कमाल तापमानाचा उच्चांक गाठला जात आहे़ याबरोबरच हवेचे चलनवलन कसे आहे, यावर तापमान ठरते़ .

याचे उदाहरण द्यायचे झाले तर बंद खोलीतील हवामान आणि उघड्या खोलीतील तापमानात जसा फरक पडतो तसेच जर गरम हवा साचू राहिली तर तेथील तापमानात मोठी वाढ होऊ शकते़. तापमान वाढीत हा व्हेटिलेशन इंडेक्सही महत्वाचा ठरतो़. या कारणांमुळे पुण्यात शंभर वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. १८९७ मध्येहीही अशीच परिस्थिती निर्माण झाली असेल़ त्याच्या अगोदरच्या वर्षी दुष्काळी स्थिती असण्याची शक्यता असल्याने जमिनीतील ओलावा जवळजवळ नसल्यासारखा असू शकतो़. त्यामुळे तेव्हा ४३़३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले असेल़ विषववृत्तावर निर्माण झालेली चक्रीवादळाची स्थिती अजून २ दिवस तरी राहणार आहे़. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमान असेच वाढते राहण्याची शक्यता आहे, असे डॉ़ जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .

टॅग्स :Temperatureतापमान