शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:43 IST

पाच शहरांना जास्त धोका : ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ संस्थेचे संशोधन

पुणे : ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा व ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना २०१९ मध्ये सर्वात जास्त लक्ष्य करण्यात आले. महाराष्ट्रात ३ कोटी ८० लाख, तर दिल्ली एनसीआरमध्ये २ कोटी ५० लाख ‘सायबर थ्रेट’ उघड झाले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात यांनाही सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता व पुणे या शहरांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून आहेत. देशात रोज २० लाखांहून अधिक ‘सायबर थ्रेट’ उघड झाले.या अहवालाविषयी संशोधन संस्थेचे संचालक संजय काटकर म्हणाले, खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक केले जातात. त्याकरिता सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. समाजासाठी धोकादायक कारस्थाने केली जातात, अशा ठिकाणी ही माहिती विकली जाते. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता व जुन्या आॅपरेटिंग सिस्टिम्स यांमुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात.वायफाय राऊटर्सवरही हल्लेडिजिटल धोक्यांपासून वाचण्यासाठी वायफाय राऊटर्स सारखी साधने सुरक्षित असूनही सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतींद्वारे त्यांच्यावरही हल्ले केले. स्मार्ट टीव्ही, फोन, आयपी कॅमेरे यासारख्या स्मार्ट आयओटीवर आधारित डिव्हाइसमधील असुरक्षिततेचाही त्यांनी वापर केला आहे.स्मार्टफोन असुरक्षितसायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ते ओळखणे वा पकडले जाणे अवघड होत आहे. स्मार्टफोन सर्वाधिक असुरक्षित व सायबर गुन्ह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक आहेत. स्पायवेअर व मालवेअर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी २०१९ मध्ये केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसdigitalडिजिटल