शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:43 IST

पाच शहरांना जास्त धोका : ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ संस्थेचे संशोधन

पुणे : ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा व ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना २०१९ मध्ये सर्वात जास्त लक्ष्य करण्यात आले. महाराष्ट्रात ३ कोटी ८० लाख, तर दिल्ली एनसीआरमध्ये २ कोटी ५० लाख ‘सायबर थ्रेट’ उघड झाले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात यांनाही सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता व पुणे या शहरांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून आहेत. देशात रोज २० लाखांहून अधिक ‘सायबर थ्रेट’ उघड झाले.या अहवालाविषयी संशोधन संस्थेचे संचालक संजय काटकर म्हणाले, खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक केले जातात. त्याकरिता सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. समाजासाठी धोकादायक कारस्थाने केली जातात, अशा ठिकाणी ही माहिती विकली जाते. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता व जुन्या आॅपरेटिंग सिस्टिम्स यांमुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात.वायफाय राऊटर्सवरही हल्लेडिजिटल धोक्यांपासून वाचण्यासाठी वायफाय राऊटर्स सारखी साधने सुरक्षित असूनही सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतींद्वारे त्यांच्यावरही हल्ले केले. स्मार्ट टीव्ही, फोन, आयपी कॅमेरे यासारख्या स्मार्ट आयओटीवर आधारित डिव्हाइसमधील असुरक्षिततेचाही त्यांनी वापर केला आहे.स्मार्टफोन असुरक्षितसायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ते ओळखणे वा पकडले जाणे अवघड होत आहे. स्मार्टफोन सर्वाधिक असुरक्षित व सायबर गुन्ह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक आहेत. स्पायवेअर व मालवेअर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी २०१९ मध्ये केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसdigitalडिजिटल