शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

By नितीन चौधरी | Updated: January 24, 2024 16:45 IST

राज्यात अशा ५४ हजारांहून अधिक जणांनी आगाऊ नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे...

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. मात्र, यादीचे अद्ययावतीकरण सुरू राहणार असून आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक मतदारांचा १ एप्रिल रोजी मतदार यादीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. राज्यात अशा ५४ हजारांहून अधिक जणांनी आगाऊ नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या तरुणांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे. यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहुअर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली आहे. त्यानुसार राज्यात पूर्वनोंदणीचे एकूण ५४ हजार २६३ अर्ज आले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार १ एप्रिल पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा मतदार यादीत समावेश केला जाणार आहे. राज्यात अशा आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजार ८३२ जणांचा मतदार यादीत समावेश केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. तर १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या १७ हजार ६५९ जणांचा, १ ऑक्टोबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या १७ हजार ७७२ जणांचाही त्यानंतर यादीत समावेश केला जाणार आहे. या पूर्वनोंदणी केलेल्या तरुणांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.-----------

११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे वगळलीयेत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार राज्यातील ११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांपैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले ४ लाख ९२ हजार ३९५ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. राज्यातील सर्वाधिक १ लाख ७ हजार १९८ मृतांची नावे सोलापूर जिल्ह्यात वगळण्यात आली आहेत. तर सातारा जिल्ह्यात ९१ हजार ४७० तर ८४ हजार ३४६ मृतांची नावे पुणे जिल्ह्यात वगळण्यात आली आहेत. सर्वात कमी वगळलेली ८ हजार ४२७ मृतांची नावे हिंगोली जिल्ह्यातील आहेत.

------एकसारखे फोटो, नावे तपशील असणारी नावे वगळली

मतदार याद्यांमध्ये ९ लाख ५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत २ लाख ८४ हजार ६२० मतदारांच्या नावे वगळली आहेत. मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले २ लाख ५४ हजार ४६० मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ७४ हजार ४२६ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.कोटनाव वगळल्यामुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झाली आहे.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :VotingमतदानPuneपुणेlok sabhaलोकसभा