शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:46 AM

राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.

पुणे - राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकांद्वारे या महाविद्यालयांची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जादा प्रवेश दिले असल्यास ते तातडीने रद्द करण्याचे आवाहनही विभागाने महाविद्यालयांना केले आहे.राज्यात सध्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडसह अन्य सहा महानगर क्षेत्रामध्ये ही प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर अन्यत्र महाविद्यालयस्तरावरच ही प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान राज्यातील काही महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी माध्यमिक शिक्षण उपसंचालक, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरामध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये प्रत्येकी चार भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील या पथकांमध्ये तीन प्राचार्यांचा समावेश असेल.इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या सहा महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश लगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात घेतले असल्यास आणि संबंधित महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश झाले असल्यास विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये येऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’ प्रणालीतील माहिती दि. ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.महाविद्यालयांची मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.प्रवेश रद्द कराज्या महाविद्यालयांनी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाने तसेच विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करावेत, असे आवाहन सुवर्णा खरात यांनी केले आहे. या सूचनेप्रमाणे कार्यवाही न करणाºया उच्च महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसण्याची संधी न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे खरात यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे