शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:47 IST

राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.

पुणे - राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकांद्वारे या महाविद्यालयांची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जादा प्रवेश दिले असल्यास ते तातडीने रद्द करण्याचे आवाहनही विभागाने महाविद्यालयांना केले आहे.राज्यात सध्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडसह अन्य सहा महानगर क्षेत्रामध्ये ही प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर अन्यत्र महाविद्यालयस्तरावरच ही प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान राज्यातील काही महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी माध्यमिक शिक्षण उपसंचालक, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरामध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये प्रत्येकी चार भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील या पथकांमध्ये तीन प्राचार्यांचा समावेश असेल.इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या सहा महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश लगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात घेतले असल्यास आणि संबंधित महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश झाले असल्यास विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये येऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’ प्रणालीतील माहिती दि. ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.महाविद्यालयांची मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.प्रवेश रद्द कराज्या महाविद्यालयांनी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाने तसेच विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करावेत, असे आवाहन सुवर्णा खरात यांनी केले आहे. या सूचनेप्रमाणे कार्यवाही न करणाºया उच्च महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसण्याची संधी न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे खरात यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे